# सिनेमा गल्ली ' *आलाप* ' चित्रपट
# सिनेमा गल्ली
' *आलाप* ' चित्रपट
आजच हृषीकेश मुखर्जी दिग्दर्शित ' आलाप' हा नितांतसुंदर चित्रपट बघितला ..खरे तर सध्या लॉक डाऊन च्या मुळे वेळ मिळत आहे ..या चित्रपटापर्यंत मी कसा पोहोचलो ती पण एक वेगळीच ष्टोरी आहे ..वेळ असल्याने मी माझ्या जुन्या डायऱ्या काढून बसलो होतो ..त्यात 2000 साली लिहलेल्या डायरीत मला या चित्रपटात असलेले " कोई गाता मैं सो जाता " हे पुर्ण गाणे लिहलेले मिळाले ...कदाचित हे गीत मला कविता म्हणून खूप आवडले होते म्हणूनच मी ते लिहून ठेवले असावे ...मग त्या जुन्या आठवणी जाग्या होताना मला या गाण्याची चाल ही आठवली ...मग मी हे गाणे सारखे गुणगुणत राहिलो .... म्हणजेच या गाण्याने माझे हृदय तेव्हाच जिंकले होते . म्हणूनच मधल्या काळात (२० वर्षांत ) हे गाणे कधीही न ऐकूनही त्याची चाल व पूर्ण गीत मला पाठ होते . फक्त डायरीत दिसल्याने त्याला ट्रिगर मिळाला ... तीन दिवसापूर्वी हे गाणे मी you tube वर बघितले ...आणि नंतर कमीतकमी दहा वेळा बघितले ....आणि आज हा प्रवास मला हा चित्रपट amazon prime वर मिळाला तेव्हा पूर्णत्वास गेला, अन मी तर खूपच खुश झालो आणि चित्रपट बघून टाकला .
खरे तर *हृषीकेश* दा चा कुठलाही चित्रपट म्हणजे आपण एखादे उत्तम पुस्तक उघडावे , जसे जसे आपण वाचत जावे तसे तसे आपण त्या कथेत एव्हडे गुंतून जावे की ...सगळे काही आपल्या आजूबाजूला घडत असावे असे भासते ...आपणही त्या पात्रांचे भागच बनूण जातो ...मग हा चित्रपट पुस्तक उलगडत जावे अगदी अगदी तसा च उलगडत जातो आणि आपण एक अद्भुत अनुभवाच्या सागरातून प्रवास करून बाहेर येतो . आणि हा प्रवास संपतो (म्हणजे चित्रपट बघून होतो ) तरीही आपल्या मनातुन त्या सुंदर प्रवासाच्या आठवणी व प्रसंग काही केल्या जात नाहित ...हीच ताकद आहे त्यांच्या दिग्दर्शनाची ...
*आलाप* हा असाच चित्रपट आहे . हा चित्रपट एक *अलौकीक* अनुभव देऊन जातो . एका श्रीमंत घरात जन्म घेतलेल्या गायकाची कथा . अतिशय संयत पणे दिग्दर्शक कथा उलगडत नेतो .. अमिताभ व रेखा दोघेही उत्तम गायक असतात पण व्यावहारिक जग त्यांच्यातील कलेला जगू देत नाही .
जयदेव यांचे संगीत म्हणजे परत परत मिळणारा एक दैवी अनुभव असतो ..दोन गाणे , लता दिदीने गायलेले " *माता* *सरस्वती* *शारदा* " तसेच " *कोई* *गाता* *मैं* *सो* *जाता* " हे *हरिवंशराय* *बच्चन* लिखित गीत म्हणजे या चित्रपटाची बलस्थाने आहेत ..
*रेखा* व *अमिताभ* यांचा एकत्र असा हाही असा एक उत्तम चित्रपट आहे .
तसे हृषीकेश दा च्या दिग्दर्शन साठी माझे शब्द कमी पडतील .प्रत्यक्ष चित्रपट बघण्याचा अनुभव एक समृद्ध प्रवास असू शकेल , जो तुमच्या जीवनाला एक वेगळा *आशय* प्राप्त करून देईल हे नक्की !
© हेमंत सांबरे
( कुणी हा चित्रपट बघितला असेल तर तुमचे अनुभव मला वाचायला आवडेल )
Comments
Post a Comment