शिवाजी* *महाराज* यांचे अदभुत युद्ध धोरण


शिवाजी* *महाराज*  यांचे अदभुत युद्ध धोरण

नुकताच परत एकदा " पद्मावत " हा चित्रपट बघितला . या चित्रपटात दाखविले आहे की अल्लाउद्दीन खिलजी दोनदा निःशस्त्र राणा रतनसिंग च्या समोर येतो व दोन्ही वेळेस रतनसिंग त्याला ठार न मारता सोडून देतो त्याच वेळी रतनसिंग एकदाच निःशस्त्र च्या समोर येतो व अल्लाउद्दीन त्याला लगेच पकडून दिल्लीला घेऊन जातो . 

 *अवसान* *घातक* *व* *देशबुडवी* *सहिष्णुता* 

दिल्ली तुन निघताना रतनसिंग मोठ्या आवेशाने म्हणतो की राजपूत निशस्त्र शत्रूवर वार करत नाही , आणी शेवटच्या प्रसंगी मलिक कफूर मात्र रतनसिंग च्या पाठीवर वार करून त्याला ठार मारतो .
             *काय* *गमावले* ?

रतनसिंग च्या या  अवसान घातक सहिष्णू गुणामुळे त्याने पूर्ण मेवाड चे राज्य हाल हाल होऊन मरण्यासाठी अल्लाउद्दीन व त्याच्या फौजेच्या हवाली केले .हजारो राजपूत स्रिया जोहर करून आगीच्या हवाली झाल्या .  कल्पना करा पहिल्याच वेळी हा अल्लाउद्दीन राजपुतांच्या ताब्यात मिळाल्यावर त्याला ठार केले असते तर ?  नाही पहिल्या वेळी तर  निदान दिल्लीत दुसऱ्यांदा संधी मिळाली तेव्हा तरी ठार केले असते तर ? निदान तेव्हा तरी सिध्द झालेच होते की, अल्लाउद्दीन ला त्याच्याच पद्धतीने उत्तर द्यायला हवे होते ।. पण ते राणाने केले का ? तर नाही .
        
       *अशाच* *प्रसंगी* *शिवाजी* **राजे****कसे** *वागले* ? 

अफजलखान जेव्हा स्वराज्यावर हल्ला करून आला तेव्हा शिवाजी महाराजांनी प्रतापगड येथे  समोरासमोर आल्यावर काय केले ?  त्यांनी त्याला पूर्ण ठार मारले . रात्रीच्या वेळी अचानक हल्ला करून शाईस्तेखानाची बोटे छाटून त्याला पुण्यातून पळवून लावले ( रात्रीच्या वेळी गुपचूप का जावे असा विचार ते करत बसले नाही ) . आणी मला वाटते हेच  कारण असावे की मराठयांचे राज्य चहू दिशांना व पूर्ण भारतभर पसरले .
कारण मराठ्यांच्या शब्दकोशात अशी देशबुडवी सहिष्णुता नव्हती .मला पक्केपणे वाटते की ही जशाच तसे वागण्याची ही  शिकवण खुद्द जिजाबाई नी शिवरायांना दिली असावी कारण राजपूत राजांनी ज्या चुका केल्या व त्याची फळे भोगली ते त्यांच्या डोळ्यासमोर असावे  . त्यामुळे  मराठ्यांच्या शत्रूला पक्का धाक बसला होता जर आपण यांना धोका दिला तर ते ही त्याच धोक्याच्या पद्धतीने आपल्याला ठार मारण्यास कमी करणार नाही .. याच जशास तसे शत्रूबरोबर वागण्याच्या वृत्तीमुळें तब्बल १४३ वर्षे ( १६७४- शिवराज्याभिषेक  ते १७१७ पेशवाईचा शेवट)  मराठयानी भारतावर राज्य केले .

 *ता* *.* *क* . या लेखाचा उद्देश राजपूत आणी शिवाजी राजे यांची युद्धनीती ची तुलना करणे एवढाच आहे . 
१४.०२.२०२०.

Comments

  1. राज्यकारभार चालवताना, देशविरोधी शक्तीही अश्याच मोडून काढल्या पाहिजेत.

    ReplyDelete
  2. हे स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा ही माणसीकता उत्तरेकडे जे राजे होऊन गेले त्यांच्यात पहायला मिळत नाही. त्याला धेय लागत ते जीजाऊंना चांगलेच ठाऊक होते म्हणून तर शिवाजी महाराज घडले. 🙏. काही चुक असेल तर माफ करा

    ReplyDelete
  3. शिवरायांचे धोरण कालसापेक्ष होते. कृष्ण जसा यशोदेचा बाळ होता, सवंगड्यांचा सखा होता आणि राक्षसांचा कर्दनकाळ होता तीच नीति शिवरायांची होती. जशास तसे वागणे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सावरकर का नको ?

नगरी भाषा - माझी मायबोली-हेमंत सांबरे

#इस्रायल आणी स्वातंत्र्यवीर सावरकर