Posts

Showing posts from May, 2021

सावरकर का नको ?

Image
सावरकर समजून घेताना  (सावरकर कुटुंब )  लेखमालेतील पाचवा व अंतिम भाग  👇👇  *सावरकर का नको ?*  स्वातंत्र्यवीर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अतिशय उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते . या व्यक्तीने हजारो लोकांना प्रेरित केले व कित्येकांना सर्वोच्च त्याग करण्यासाठी उद्युक्त केले .  ब्रिटिश सरकार वीर सावरकरांना आपले सर्वात मोठे व बुद्धिमान शत्रू समजत .आजही ब्रिटिशांनी सावरकर लंडन मध्ये जेथे राहत त्या घराच्या बाहेर लिहून ठेवले आहे , " Vinayak Damodar Savarkar , The Great Indian Patriot And Philosopher Lived Here " ,  म्हणजे ही अशी पाटी तिथे लावण्यात आज ब्रिटिशांना ही गर्व वाटत आहे .  ( लंडन मधील इंडिया हाऊस , जेथे सावरकर राहिले होते )  गाय आलड्रेड हे ब्रिटिश पत्रकार म्हणतात की , " सावरकर हे महान द्रष्टे आणी मानवतावादी नेते आहेत " . ठाकूर चंदनसिंग हे नेपाळ मधील गुरखा समाजाचे मोठे नेते जेव्हा सावरकरांना प्रत्यक्ष रत्नागिरीत भेटले व त्यांचे भाषण ऐकले तेव्हा म्हणाले , " नेपोलियन कसा असेल याची आता मला कल्पना आली !" . ...

अक्षय जोग यांच्या " स्वातंत्र्यवीर सावरकर- परिचित अपरिचित या पुस्तकाचे परीक्षण

Image
 अक्षय जोग यांच्या नुकत्याच प्रसिध्द झालेल्या "स्वातंत्र्यवीर सावरकर:  परिचित- अपरिचित" पुस्तकावर Hemant Sambare यांनी लिहिलेले आणि मुंबई तरुण भारत मध्ये प्रसिध्द झालेले पुस्तक परीक्षण. https://www.mahamtb.com/Encyc/2021/5/22/article-on-book-review-swatantraveer-sawarkar-wrtten-by-akshay-jog.htmल

#इस्रायल आणी स्वातंत्र्यवीर सावरकर

Image
इस्रायल आणि स्वातंत्र्यवीर सावरकर  सावरकर हे खास करून काळाच्या ही पुढे जाऊन विचार करणे यासाठी ओळखले जातात .  यहुदी वा ज्यू लोकांनी पॅलेस्टाईन मध्ये स्वतःचे स्वतंत्र राष्ट्र निर्माण करणे यासाठी सावरकरांचा पूर्ण पाठिंबा होता . ज्यू स्वतःचे राष्ट्र निर्माण करतील हे त्यांनी खूप आधीच सांगितले होते (साल  १९२१ - हिंदुत्व  या पुस्तकात)  याचवेळी नेहरू व त्यांचे सरकार या ज्यू राष्ट्राला विरोध करत होते व त्याचवेळी अनेक बलाढ्य राष्ट्रे ( अमेरिका , ब्रिटन आदी ) इस्रायल निर्मितीस  पाठिंबा देत होते .त्यामुळे या बलाढ्य राष्ट्रांचा रोष ओढवून घेण्याचा धोका निर्माण झाला . या चुकीच्या व हास्यास्पद  परराष्ट्रीय धोरणाला सावरकरांनी विरोध केला .  त्याचवेळी  हेच बलिष्ठ ज्यू राष्ट्र  आक्रमक आघाडी निर्माण करणाऱ्या मुस्लिम गटांना ( अरब राष्ट्रे ) यांना समर्थ प्रतिकार करण्याचे काम करेल , असे द्रष्टे सावरकर सांगतात .  ते नमूद करतात की भारताने इस्रायल ला पाठींबा देणे हे भारताच्या हिताचे आहे .  ( सोबत ऐतिहासिक निवेदने - लेख...

#हिंदुराष्ट्र - सावरकरांचे!

Image
#हिंदुराष्ट्र - सावरकरांचे  ( वाचकहो! ' सावरकर समजून घेताना ', या   लेखमालेच्या आपण गेल्या तीन भागांना जो प्रतिसाद दिला त्याबद्दल आभार 🙏 .लेखमालेतील चौथा भाग आपल्यासमोर घेऊन येताना  खूप आनंद होत आहे . वाचकांस विनंती आहे की लेख पूर्ण वाचून मगच कुठल्याही निष्कर्षाप्रत यावे - To the conclusion  . )  वाचकहो , ' *हिंदुराष्ट्र* ' हा विषय आजच्या घडीला खूप महत्त्वाचा विषय होऊन बसला आहे .याबाबत अनेक मत मतांतरे आहेत , अनेकांनी हा विषय अनेक पद्धतीने मांडला आहे .पण हाच विषय वीर सावरकरांनी कसा मांडला होता , हे बघणे खूपच गरजेचे आहे . बऱ्याचदा एखादी गोष्ट पूर्ण समजून न घेताच त्याआधीच त्यावर विनाकारण इतके वाद घातले जातात , की त्यामुळे मूळ विषय बाजूला राहतो व त्या विषयाचे गांभीर्य हरवून जाते .  म्हणूनच हा विषय मी आपणापुढे सुसूत्र पद्धतीने ,पण अतिशय सोप्या भाषेत मांडणार आहे . मला खात्री आहे की लेख पूर्ण वाचताच तुमच्या मनाच्या सर्व शंका दूर होतील व तुम्ही सावरकर प्रणीत हिंदुराष्ट्राचे  पुरस्कर्ते व्हाल ! हा विषय पुढे नेताना आपण नेमके ' *राष्ट्र* ' म्हणजे काय हे समज...

सावरकर यांचे हस्ताक्षरातील दुर्मिळ पत्र*

Image
# *सावरकर यांचे हस्ताक्षरातील दुर्मिळ पत्र*  श्री राजोपाध्याय - जळगाव यांचे आभार 🙏 हे पत्र मला जळगाव येथे राहणारे  श्री राजोपाध्याय यांच्याकडून मिळाले .  श्री राजोपाध्याय यांनी माझा ' सावरकर यांचे वैयक्तिक आयुष्य व स्वभाव दर्शन ' हा लेख वाचून मला दूरध्वनी केला व त्यातून आमची ओळख झाली . सौ राजोपाध्याय यांचे वडील सावरकरांचे निस्सीम भक्त होते व त्यावेळी ते मुळशी येथे राहत . सावरकरांचे भाषण मुंबई वा पुणे येथे असताना ते आवर्जून जात व सौ राजोपाध्याय यांनी फोनवर बोलताना ही आठवण आवर्जून सांगितली व हे सांगताना त्यांना वडिलांच्या आठवणीने रडू कोसळले . त्यांच्या वडिलांना सावरकरांच्या जवळ जाऊन त्यांचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले होते .  परवा श्री राजोपाध्याय यांनी मला हे पत्र पाठविले व त्यांनी यावर मी लिहावे असे सुचविले .  या पत्रात वीर सावरकर श्री परुळेकर यांच्या घरी थांबले होतें व जेव्हा ते मुंबईला परत पोहोचले तेव्हा त्यांनी हे पोहोच पत्र लिहले . यात सावरकर श्री परूळेकर व सौ परुळेकर या दोघांचेही आभार मानतात . यातून घरातल्या स्त्रीने जे कष्ट घेतले त्...