Posts

Showing posts from September, 2021

सावरकर कधीही बदलले नव्हतेच !

Image
चापेकर बंधूंच्या बलिदानाने प्रेरित होऊन सावरकरांनी वयाच्या १५ व्या वर्षी प्रतिज्ञा केली , " देशाचे स्वातंत्र्य परत  मिळविण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मी शत्रूस मारिता मारिता मरतो झुंजेन !" व त्यानंतर त्यांनी या मार्गावर कधीही माघार घेतली नाही , हे वर्ष होते १८९८ .त्यानंतर बरोबर ४९ वर्षांनी भारताला स्वातंत्र्य मिळाले . पण या मधल्या काळात बरेचसे बदल भारतात , इंग्रजांशी लढण्याच्या  पद्धतीत होत गेले .पण भारताला स्वातंत्र्य केवळ शस्त्र हाती घेतल्यानेच मिळणार याबद्दल सावरकरांची खात्री होती व ते त्यांनी करून दाखवले . सावरकरांचे आदर्श हे छत्रपती शिवाजी महाराज व श्रीकृष्ण हे दोघे होते ..त्यांच्या अनेक कविता , लेखन यांत या दोघांचा वारंवार उल्लेख येतो . सावरकरांचे शत्रू ब्रिटिश होते व ब्रिटिश सावरकरांना आपले सर्वात ' धोकादायक शत्रू ' मानत होते .ब्रिटिशांना सावरकरांना मोकळे राहू द्यायचे नव्हते , त्याचवेळी सावरकरांना ब्रिटिशांची कैद नको होती .मुक्त राहिलो तरच आपण देशाचे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी प्रयत्न करू शकतो हे त्यांना पक्के ठाऊक होते .आणि सावरकर इंग्र...