विज्ञाननिष्ठ देव

( हा लेख मी तब्बल  पंचवीस वर्षांपूर्वी म्हणजे १९९६ साली लिहला होता , तेव्हा मी १४ वर्षांचा असेल . आज माझ्या जुन्या डायरीत सापडला .आज वाचताना त्यावेळच्या वयाच्या मानाने आजही हे विचार मला फारच बुद्धिवादी वाटले , पण वाचकांसाठी हा लेख जसाच्या तसा देत आहे ,प्रांजळपणे कबूल करतो की यातल्या बऱ्याच विचारांशी आज मी स्वतः ही कदाचित सहमत नाही ) 

आज जो जो पाहावे तो आपल्या देशात देवभोळेपणा सुशिक्षित पणा बरोबर खूप वेगाने वाढत आहे .बऱ्याचदा जुन्या संतांच्या भक्तीतून असे अनुभवास येते की " देवभक्ती" ही निर्भयतेतून जन्म घेते तर देवभोळेपणा केवळ भीतीतून!

माझ्या जीवाचे काहीही बरेवाईट होवो मी माझ्या देवाची भक्ती करणारच , त्याने जन्म दिलेल्या व माझे बांधव असलेल्या मानवजातीचे कल्याण करण्यासाठी झटणार ही झाली देवभक्ती ! अगदी याविरुद्ध म्हणजे अमकी-तमकी गोष्ट केल्याने अथवा न केल्याने देव माझ्यावर प्रसन्न होईल म्हणून अंधश्रद्धा बाळगून कर्मकांडे करणे . देवभक्ती परोपकारातुन जन्म घेते तर देवभोळेपणा स्वार्थाच्या अल्पकाळ मिळणाऱ्या प्राप्तीच्या आशेने ! 

आज सर्वत्र स्वार्थ माजला आहे हे कुणी नाकारू शकेल का ? जो जो मनुष्य स्वार्थाने वागू लागतो तो तो त्याला भीती वाटू लागते , माणसाचे मन कमकुवत बनते , त्यावेळी तो दैव व नशीब याचा आधार घेऊ लागतो .अगदी वाईट मार्गावर चालणारे ही " देवा ,मला या संकटातून सोडव मी तुला हे वाहील ते देईल " असे सांगून देवालाच लाच देऊ पाहतात .योगायोगाने त्यांची यातून सुटका होते व देवानेच मला यातून सोडवले असा प्रचार करतात व आपण केलेल्या कृत्याचे समर्थन करतात की बघा की , "मला देवाची कशी साथ आहे " खरे तर देव म्हणजे न्यायी , चांगल्याला साथ देणारा असे सर्वसाधारण समज , मग अन्यायाला ,  वाईटाला ही साथ देणारा देव असा कसा ? हा प्रश्न पडतोच ! 

खरंतर देव प्रत्यक्षात आहे की नाही , खरा की खोटा या पोकळ चर्चा करण्यापेक्षा ती संकल्पना आपल्या समाधानासाठी , उत्कर्षासाठी कशी वापरावी हे शिकायला हवे .देव खरंतर वाईटाच्या बाजूने नसतो , तितकाच तो चांगल्याच्या बाजूने नसतो , तो असतो सत्याच्या बाजूने ! सत्य कधीही बदलत नसते .जे जे राष्ट्राच्या , मनुष्याच्या हितकारक व दुसर्यांना आनंद देणारे तेच सत्य अशी सत्याची ढोबळमानाने व्याख्या करावी लागेल .मग याच न्यायाने " देव विज्ञाननिष्ठ " आहे हे अगदी सहजपणे सिद्ध करता येईल .कारण विज्ञान हे सत्यावर आधारित असते व कोणतीही गोष्ट सत्याच्या कसोटीवर तपासल्याशिवाय विज्ञान पुढे जात नाही व विश्वास ही ठेवत नाही . म्हणूनच ज्या ज्या देशांनी देवभोळेपणा व धर्मभोळेपणा (मग हा कुठलाही धर्म असो ) टाकून विज्ञानाची वाट धरली त्याच देशांचा खरा विकास झाला आहे . 
आपली भारतीय संस्कृती ही जगातील सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे . आज आपल्या देशांत भारतीय संस्कृती व विज्ञान यांनी हातात हात घालून चालणे फार गरजेचे आहे .आपण विज्ञानाद्वारे प्रगतीचे शिखर गाठू व आपली संस्कृती साऱ्या जगाला मार्गदर्शक ठरेल  अशी आहेच . भारतीय अध्यात्म व भारतीय विचार याकडे आज जग आशेने बघत आहे .म्हणूनच देवभोळेपणा टाकून " विज्ञाननिष्ठ देव" ही संकल्पना स्वीकारून वैभवशाली भारताची निर्मिती आपण करूच करू ! 
© हेमंत सदाशिव सांबरे 
संपर्क -९९२२९९२३७० . 
२५.०५.१९९६ . 
( हा लेख जुन्या डायरीतून वाचकांसाठी , कसा वाटतो हे नक्की कळवणे फोन / SMS करून ) 

Comments

  1. अतीशय सुंदर आणि प्रगल्भ विचार

    ReplyDelete
  2. Replies
    1. वयाने लहान असले तरी विचार थोर आहेत. ज्ञान, विज्ञान, आनंद ह्या उच्च पायऱ्या म्हणजेच अध्यात्म/ देव....' विज्ञाननिष्ठ देव ' तुमचा निबंध उत्तमोत्तम आहे.

      Delete
  3. व्वा, छान 👌👍👍

    ReplyDelete
  4. पण देव म्हटले की ,चिकित्सा संपते.

    ReplyDelete
  5. उत्कृष्ट आणि वेगळे विचार

    ReplyDelete
  6. त्या वयातील समज वाखाणण्याजोगी आहे 👍

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सावरकर का नको ?

नगरी भाषा - माझी मायबोली-हेमंत सांबरे

#इस्रायल आणी स्वातंत्र्यवीर सावरकर