नास्तिकतेकडून अस्तिकतेकडे ! (का व कसे ? ) atheism to deism { Why and How ? }

नास्तिकतेकडून अस्तिकतेकडे ! (का व कसे ? ) atheism to deism { Why and How ? 
( श्री गोंदवलेकर महाराज समाधी मंदिर ) 

हे असे लिहले पाहिजे असे अलीकडेच मनात आले . कारण हा जो बदल झालाय तो काही एकदम , अचानक असा झालाय असेही नाही ! हे कदाचित गेल्या दोन दशकांचा प्रवास आहे , आणि हा प्रवास ही खूप संथ , पण निर्णायक झालाय .म्हणूनच अलीकडे तो माझ्या मनाच्या पातळीवर मला स्वतःलाच खूप ठळकपणे जाणवू लागला ,म्हणूनच ही बदललेली ' जाणीव ' कशी आहे 'व ती 'कशी बदलली 'हे  आपणासोबत मांडावे असे वाटले ..यात मला स्वतःला ही मोकळे होता आले तर पाहावे हा ही विचार आहेच ! मी आपणाशी व्यक्त होत जातो , कसे वाटते तुम्ही ही सांगा .

हा कदाचित २००१-२००२ चा काळ असेल ! वयाच्या विशीत असताना वाचन ही बहुविध झाले असेल म्हणा किंवा आपल्याला खूप कळू लागले आहे असा समज असेल पण देवावरचा विश्वास उडू लागला होता ..कदाचित घरच्या लोकांबरोबर मंदिरात ही जात असे , हातही जोडत असेल ...पण त्यात भाव नव्हता ..आपण काही चुकीचे करतोय की काय असा विचार/भावना मनात असायच्या.. तर्कसंगत विचारसरणी व आजूबाजूची परिस्थिती यांची सतत कसरत सुरू होती .. याच काळात अंधश्रद्धा निर्मूलन  या विषयावरची बरीच  पुस्तके वाचताना ' देव ' ही संकल्पना खोटी वाटू लागली . त्या पुस्तकांत बुद्धीच्या कसोटीवर तपासून पाहणे हा मुख्य निकष लावा हे सारखे सांगितले जात असायचे , व ते मनाला पटत ही होते ... मानवी मनाला जिथपर्यंत आकलन होते , तितकेच तेव्हढे काही खरे , बाकी काही खरे नाही, हा 'तर्क'  , तर्कसंगत ( Logical ) वाटायचा ..

 हे एक विशिष्ट वय होते , जेव्हा आपल्या स्वतःच्या मनगटावर आपण सगळेच करू शकतो , कुठल्याही बाह्य शक्तींच्या आधाराची  मला गरज नाही असे वाटणे ही *साहजिकता* होती .. तशी काही उदाहरणे आजूबाजूला देखील होतीच , की देवाला अगदी न मानणारे , कधीही मंदिरात न जाणारे , कधीही हात न जोडणारे यशस्वी होतच होते  , त्यांचे यावाचून काही अडत नाही असेही दिसत होते (इथेही आमच्या विचारांची क्षमता फक्त ' यशस्वी ' होणे म्हणजे वस्तूंची वा साधनांची  मुबलकता इथपर्यंत येऊन संपत असावी )...आजूबाजूच्या सश्रद्ध लोकांशी मी ईश्वराच्या अस्तित्वाचे 'पुरावे ' मागू लागलो , त्यांनाही  ' ते' काही देता येत नव्हते ...पण ते असे वरवर सांगायचे की ते आपले आपण मानायचे असते ... देव तुम्ही पाहिलाय का याचे ठरीव उत्तर  'देव  'पाहिला नाही पण ' अनुभवला ' आहे असं असायचे , जे त्यावेळी पटायचे नाही ...जसे काही मित्र 'हवे ' चे ( Air )  उदाहरण द्यायचे की जशी ' हवा ' डोळ्यांना दिसत अशी नाहीच पण म्हणून ती नाहीच असे आपण म्हणू शकत नाहीच ,अशी उदाहरणे मिळायची, जी पटत नव्हती . 

नास्तिकता म्हणजे कुठल्याही आस्थेला नाही म्हणणे . जे फक्त तर्काच्या कसोटीवर खरे उतरते , जे आपल्या डोळ्यांना दिसते , ज्याला आपण स्पर्श करू शकतो , हाताळू शकतो किंवा ज्या गोष्टींचा एक काहीतरी निर्णय ( Outcome ) आहे ते आणि फक्त तेव्हढेच काय ते खरे , हा बुद्धिप्रामाण्यवादी विचारसरणीचा सिद्धांत आहे ... पण या विचारसरणीत मग असेही मानणारी वा मानायला लावणारी ही ' मानवी बुद्धी ' कुणी तयार केली? किंवा प्रत्येक गोष्ट घडण्यामागे त्या गोष्टीची ' जाणीव ' होणे व प्रत्यक्षात  दरवेळी त्याचा' पुरावा मागणे ' इथपर्यंत येऊन थांबले की झाले असे ते झाले ... बरं पुरावा मागताना ही आपल्या मनाची वा विचारांची वा प्रगल्भतेची जी क्षमता जितकी आहे ( Capacity to understand )  , तितक्याच पातळीवर तो  पुरावा मागितला जायचा ..
 बाह्य स्वरूप हे असे होते !

 माझ्या आजूबाजूच्या लोकांकडे बहुतेक माझ्या प्रश्नांची उत्तरे नसली की मी कुणीतरी ' विजेता ' असल्याचा फील यायचा , जो मलाच खूप भारी वाटायचा .. पण त्याचवेळी माझे मन तितकेच स्थिर होते का ? आज मागे वळून पाहतो तर  लक्षात येते की ते तसे स्थिर नव्हतेच ! एक insecured असल्याचा एक सततचा भाव वा विचार मनाच्या अंतरंगात होता व कदाचित त्याचवेळी मी बाहेर मात्र याला दाखवत नव्हतो ..एकप्रकारचे एक सोंग वा ढोंग मी अचूकपणे वठवायचो . मनाने मी खूप भक्कम आहे , मला या सगळ्या कुबड्यांची गरज नाही असे अगदी ठासून असायचे ..

माझी आई मात्र खूप श्रद्धाळू अशीच होती ..अनेक व्रत , उपवास , नवस असे ती आमच्यासाठी करत असायची .मी तिलाही खोडून काढायचो व सांगायचो की हे सगळे सोडून दे , याचा काही उपयोग होत नसतो ..पण आज मागे वळून पाहताना जाणवते की आईने मात्र मला कधीही खोडून काढले नाही वा विरोध असा केला नाही , ती स्वतःचे जे काही करायचे ते करत राहिली व मलाही माझ्या पद्धतीने पुढे जाऊ दिले ..

मग २००९ मध्ये अस्मादिकांचे लग्न झाले ..माझी बायको स्मिता माझ्या आयुष्यात आली ...स्मिता म्हणजे आधीपासूनच श्री गोंदवलेकर महाराजांची भक्त !  ' नामस्मरण ' हा तर तिच्या आयुष्याचा मुख्य गाभा! त्यामुळे आमचे लग्न झाल्यावर नास्तिकता विरुद्ध आस्तिकता असा सुप्त संघर्ष साहजिक सुरू झाला ... पण दुसऱ्याच्या विरुद्ध विचारांना सन्मान देणे हे आईने शिकवले असल्याने ' तू तुझे बघ ' , ' मी माझे बघतो ' अशा प्रकारची तडजोड करण्याचा प्रयत्न सुरू झाला ..पण जसजसे आम्ही वैवाहिक आयुष्यात पुढे जाऊ लागलो तसतसे मला माझ्यात जो ' *मी* ' शोधत होतो तो मला ' *तिच्यात* ' सापडत आहे असे वाटू लागले ...हे मी अजून पुढे स्पष्ट करतो ...ते असे- लग्न झाल्यावर वेगळ्या जबाबदाऱ्या येतात वा संकटे येतात ते हाताळत असताना ' ती' माझ्यापेक्षा जास्त स्थिर ( stable ) असायची , मी मात्र Result काय येईल , वा कशाचे काय होईल या भीतीने पछाडलेला असायचो ....म्हणजेच खरी संकटे वा अडचणी आल्या की त्यांना सामोरे जाण्याची तिची क्षमता माझ्यापेक्षा कितीतरी पुढे वा अफाट होती व हे करताना तिचे मनही खूप स्थिर आहे असे जाणवू लागले ...


मग आम्ही कधीतरी पुढे ' गोंदवले ' येथे गेलो असू . मग नंतर असे सतत जात राहिलो ..तेथले वातावरण मला बेहद्द आवडले ..कारण येथे कशाचाही अवडंबर नव्हता , कशाचाही बडेजाव नाही ...कुठलाही जातीभेद नाही ....येथे येणाऱ्या लोकांचे ' रामनाम ' हेच ध्येय व ' रामनाम घेणे ' हेच आयुष्य ! मी तितकासा सश्रद्ध नाही (नास्तिकच आहे ) हे माहीत असूनही कुणीही बळजबरी अशी करत नव्हते .... मी त्यापुढे ही जाऊन म्हणतो की कुणीही मला मी त्यांच्यातला नाही वा त्यांच्या सारखा वागत नाही याबद्दल ही कुणी टोकले नाही वा विचारले नाही ....प्रभू श्रीरामाची भक्ती करणे याचे  सर्वोच्च वा श्रेष्ठतम् परिमाण म्हणजे " नामस्मरण " करणे हेच आहे ...हे मला खूप सोप्पे वा सहज वाटले ..कारण गरीबातला गरीब "नामस्मरण" कुठेही बसून करू शकतो ..यात कुठलेही कर्मकांड नाही , कुठलाही खर्च नाही वा कुठेही जाऊन मोठा असा बडेजाव करण्याची गरजही नाही .....व हे नामस्मरण करताना तुम्ही येथे मंदीरात येऊनच बसले तरच त्याचे फळ मिळेल असेही कुणी सांगत नाही ..तुम्ही जिथे असाल तिथूनच करा , ज्या परिस्थितीत असाल त्याच परिस्थितीत करा , फळ मिळेलच ही खात्री ...ज्या तर्काच्या कसोटीवर  स्वतःला सारखे घासून घासून मी नास्तिक झालो होतो त्याच तर्काच्या कसोटीवर ' नामस्मरण ' हे मला योग्य वाटू लागले ..मनाचा गोंधळ कुठेतरी थांबून त्याला एक योग्य असे स्थिर होण्यासाठी ठिकाण मिळाले असे वाटू लागले ...हे ठिकाण असे आहे जिथे थांबताना मनाला स्थिरता येईल , निवांतपणा मिळेल असे वाटू लागले .

अलीकडे हे असे जाणवू लागले आहे की आपण कुठेतरी स्वतःला समर्पित ( Submit ) केले पाहिजे होते ...जे मी कदाचित पूर्वी करत नसेल ....मुळात समर्पण भाव निर्माण होणे, हा तुमचा अहंकार ( Ego ) नष्ट होणे वा नष्ट होत जाणे या प्रवासातील एक टप्पा असेल ! हेच ते समर्पित होणे म्हणजे काय हे गोंदवले येथे नेहमी जाऊन त्याची पक्की व्याख्या मनाला , हृदयाला आकळू लागली आहे , असे आज मागे वळून पाहताना जाणवत आहे ... ही भावना वा ही मनाची अवस्था असा अनुभव मी पूर्वी फक्त वाचला होता , पण अनुभवला  असा कधी नव्हता ..
 माझ्या अंतर्मनात चाललेले युध्द येथे कुठंतरी संपत आहे , त्याला एक विराम मिळतोय असे मात्र वाटतंय . 


मग स्मिता कुठल्याही प्रसंगात माझ्यापेक्षा स्थिर का असते वा डगमगत नाही याचे रहस्य मला समजू लागले होते ...ही मनाची  स्थिरता ' नामस्मरणात ' तयार होते व ते इतके सहज वा सोप्पे नाही , ती अनेक वर्षांची साधना असू शकते ! 


इथपासून मग आपली ध्येये बदलतात ..कारण वस्तूंची प्राप्ती होणे ही भौतिक ध्येय  आहे ..पण मनाची स्थिरता मिळवणे हे'  अलौकिक ' ध्येय होऊन बसते ..पण या ध्येयाच्या वाटेवर समाधानाची फुले प्रत्येक पावलावर विखुरलेली आहेत हे जाणवत राहते ..

या सगळ्या प्रवासात मी 'नास्तिक होतो'  पासून 'आस्तिक होत ' जातं आहे ..हा माझाच स्वतःचा प्रवास आहे ....बदल अगदी संथ होतोय पण हा बदल कायमस्वरूपी असा आहे ...आस्तिक होत जात असताना मी अधिक सकारात्मक ( Positive ) होत चाललो आहे ...मला स्वतःला हा बदल हवाहवासा वाटतोय!

© हेमंत सदाशिव सांबरे 
संपर्क क्रमांक -9922992370 .

Comments

  1. Jai Shriram!!!! I like your article.

    ReplyDelete
  2. नामस्मरण केल्याने सकारात्मकता वाढते हेच खरे ... कोविड काळात हा अनुभव आपण सगळ्यांनी घेतला आहे ... आयुष्याचा सुंदर प्रवास ... छान लेखन👌
    श्रीराम जयराम जयजयराम 🙏

    ReplyDelete
  3. श्रीराम जय राम जय जय राम

    ReplyDelete
  4. श्रीराम जय राम जय जय राम

    ReplyDelete
  5. देवावर श्रद्धा ठेवली पाहिजेच...नामस्मरनाणी 'वाल्या' चा "वाल्मिकी "झाला,
    कधी कधी आयुष्यात अशी
    अनेक लोक येतात की....
    ज्या प्रमाणे फुलपाखरू......हाता पर स्पर्श करून रंग.....सोडून जातो
    त्या प्रमाणे आपले
    आयुष्यपण बदलून जाते...
    छान लेख आहे 👌

    ReplyDelete
  6. एकदम छान... आमची पण तंतोतंत जुळणारी अवस्था... खूप छान लेखन... श्री राम जय राम जय जय राम...

    ReplyDelete
    Replies
    1. वा , आपली ओळख झाली तर बरे वाटेल

      Delete
  7. नामस्मरण केल्याने मनाला जी शांतता लाभते ती कुठेही विकत मिळत नाही
    मी सुद्धा आस्तिकते कडून नास्तिकतेकडे व पुन्हा आस्तिकतेकडे असा प्रवास चालू आहे.

    ReplyDelete
  8. श्रीराम जयराम जयजय राम

    ReplyDelete
  9. छान लेख. केवळ नामस्मरणाने मनाला स्थीरता लाभते, ईतर अवडंबराची गरज नाही हेच खरे.

    ReplyDelete
  10. खूप छान लिहिले आहे.लहान बाळ जस आपल्या आईचा आधार शोधत कींवा सारख माग वळून वळून बघत ,आई आहे का ?तसच मानवाच आहे.आपल्या पाठीशी ,आपल्या मागे कोणीतरी आहे म्हणल्यावर माणूस शांतपणे , धीराने आपले काम पूर्ण करतो.
    देव प्रत्येकाला वेगवेगळ्या रूपात भेटतो.

    ReplyDelete
  11. श्री राम जय राम जय जय राम 🙏

    ReplyDelete
  12. जय श्री राम

    ReplyDelete
  13. जय श्रीराम।

    ReplyDelete
  14. चांगल्या शब्दात वर्णन आहे.

    स्वामी विवेकानंद म्हणत, " दक्षिणेश्वर येथ रूढ अर्थाने निरक्षर मूर्तीपूजकाच्या पायाशी बसून मला जे ज्ञान मिळाले तसे मिळत असेल तर मूर्तीपूजेत काय वाईट आहे?"

    ReplyDelete
  15. देवाचे नाम हा एक सुंदर विचार आहे. व सुंदर विचारांची जोपासना हिच आहे खरी परमेश्वराची उपासना.

    ReplyDelete
  16. जय श्री राम । खूप समर्पक, मनाला भिडणारे असे व्यक्त केले आहे आहे हेमन्तजी. धन्यवाद.

    ReplyDelete
  17. सुंदर लेख. या आधी वाचनात आला होता. लेखनातील प्रामाणिकपणा मनाला भावला. कुणाची श्रद्धा असण्यात तर कुणाची नसण्यात.देव नाही म्हणणारे तो असण्याच्या विश्वासाला पाठबळ देत असतात असे मला वाटते.
    नामस्मरणाने कुणालाही positive support system मिळू शकते.

    ReplyDelete
  18. खुपचं सुंदर लेखन आहे.
    विचारांना कृतीची जोड
    म्हणजे नास्तिकते कडुन आस्तिकतेचा प्रवास
    कर्मकांडाला कर्माच अधिष्ठान
    म्हणजे नास्तिकते कडुन आस्तिकतेचा प्रवास
    भक्तीच्या जोडीला सेवाभाव
    म्हणजे नास्तिकते कडुन आस्तिकतेचा प्रवास

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सावरकर का नको ?

नगरी भाषा - माझी मायबोली-हेमंत सांबरे

#इस्रायल आणी स्वातंत्र्यवीर सावरकर