भारत काल , आज , उद्या -भारतीय स्वातंत्र्य अमृतमहोत्सवी वर्ष

भारत @७५
-हेमंत सांबरे 

खरे तर या विषयाचा आवाका खूप मोठा आहे , पण तरीही नियमाला बांधील राहून हा विषय मांडण्याचा प्रयत्न करतो .

भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळाले , हे स्वातंत्र्य हे इतके काही सहज वा सोप्पे नाहीच मिळाले .फाळणीच्या रूपाने दोन शत्रूराष्ट्रे एकमेकांच्या समोर उभी ठाकली .त्यामुळे " स्वातंत्र्य " हे ब्रिटिशांच्या वा मुघलांच्या पारतंत्र्यापेक्षा सुखकर आहे अशी भावना असली तरी ती भावना सर्वांसाठी नव्हती हे दुर्दैवाने नमूद करणे प्राप्त आहे . 

कोणत्याही राष्ट्राला समर्थपणे उभे राहण्यासाठी शस्रे आणि शास्र या दोन्हींची आवश्यकता असतेच असते .या पातळीवर सुभाषचंद्र बोस व स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे खूप खूप आभार मानणे क्रमप्राप्तच आहे .कारण या दोघांनी स्वातंत्र्यपूर्व काळात अतिशय दूरदृष्टीने सैनिकीकरन केले व त्याचाच फायदा स्वतंत्र भारतालाही पाकिस्तान व चीन सारख्या  शत्रूबरोबर लढताना झाला .

स्वतंत्र भारताचे गेल्या ७५ वर्षांचे माझे वाचन व अनुभव याप्रमाणे तीन टप्पे करता येतील ,

१ .१९४७ ते आणिबाणी पर्यन्त चा भारत 
२ .आणीबाणी ते अगदी अलीकडे २०१४ पर्यंत चा भारत 
३ .२०१४ नंतर चा Digital व आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारुन वेगाने प्रथम क्रमांकावर येत असलेला भारत .

१. १९४७ ते आणिबाणी पर्यन्त चा भारत 

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच बहुसंख्य लोकांना दुर्लक्ष करून अल्पसंख्य (तथाकथित) लोकांचे लांगुलचालन सुरू झाले . राजकारण व निवडणुका हे  काँगेसच्या काळात वाढत्या भ्रष्टाचाराने वर्षानुवर्षे गलिच्छ होत गेले . लालबहादूर शास्त्री सारख्या प्रामाणिक नेत्यांचा आदर्श न घेता एका वेगळ्याच पातळीवर राजकारण आणून ठेवले गेले व त्याचा कळस गाठला गेला आणीबाणीच्या काळात ! याच आणीबाणीच्या काळात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर परत तेच स्वातंत्र्य संकटात सापडले . मग त्याचवेळी आपल्या भारतीय लोकशाहीची ताकद जनतेने दाखवून दिली व जनता दलाचे सरकार आले . पण हे सरकार अल्पजीवी ठरून परत इंदिरा गांधींनी सरकार स्थापन केले .

२. आणीबाणी ते अगदी अलीकडे २०१४ पर्यंत चा भारत 

हा काळ म्हणजे भारतासारख्या विकसनशील देशाला संक्रमण कालावधी होता .देशात अनेक बदल वेगाने घडत गेले .याच काळात टीव्ही , मोबाईल , कॉम्पुटर , इंटरनेट  इ इ वस्तू नी आपले आयुष्य  व्यापून टाकले ...तसेच जगभरात अनेक मूळ भारतीय उच्च पदांवर जाऊन बसू लागले .... येथील लोकांनी ही नवनवीन गोष्टी शिकून आपल्या आयुष्यात लाक्षणिक बदल घडवून आणले ...याच काळात आपण बैलगाडी ते ट्रॅक्टर , सायकल, दुचाकी ते स्वतःची चारचाकी हा प्रवास ही सहज पार पडला ... तरीही गरीब भारताचे प्रश्न अजूनही तसेच होते , अनेक आरोग्याचे प्रश्न ही व्यवस्थित हाताळले गेलेच नाही अशा तक्रारी होत्याच ...भ्रष्टाचार सार्वत्रिक झाला आहे अशा भावना होत्या व हे कुठेतरी बदलले पाहिजे अशी सर्वसामान्य माणसांची भावना प्रबळ होत चालली होती ... बहुसंख्य हिंदूंना अजूनही आपल्यावर अन्याय होतोय , झालाय याची मनात कुठेतरी खंत वाटत होती ....यातूनच उदयाला आला २०१४ च्या नंतरचा भारत ...या भारताने नुसते आपल्या देशाला नव्हे तर पूर्ण जगाला नवनवे आयाम देण्याची पूर्वतयारी सुरू केली होती ..

३. २०१४ नंतर चा Digital व आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारुन वेगाने प्रथम क्रमांकावर येत असलेला भारत .

नरेंद्र मोदी नामक व्यक्तीने हा झंझावात तयार केला .न भूतो न भविष्यती असे बहुमत भाजपा पक्षाला मिळून हे बहुमताचे सरकार आले . एक नवीन पर्व या देशात सुरू झाले . हिंदूंनी एकगठ्ठा मते या व्यक्तीच्या पारड्यात टाकली .मोदींनी ही निराशा केली नाही . *स्वच्छता* हा त्यांनी मुख्य अजेंडा घेऊन काम सुरू केले ...येथे मी खूप भारी अनुभव सांगतो ...आमचे गाव नगर जिल्ह्यातील एक छोटे खेडेगाव आहे ...पण अगदी २०१४ पर्यंत आमच्या गावात रस्त्याच्या कडेला हागणदारी होती ...गावात प्रवेश करताना नाकाला रुमाल लावूनच यावे लागायचे ...पण आज केवळ २०१९ पर्यंतच गावात प्रत्येकाने घरी संडास बांधले आहे व आता अगदी अपवाद वगळता रस्त्यावर कुणीही संडासला बसत नाही ... आज गावचा पाण्याचा प्रश्न ही बहुतांश सुटला आहे ....पण हे साधे बदल व्हायला इतका वेळ गेला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर... जनधन खाते उघडले असल्याने थेट त्या व्यक्तीच्या खात्यात केंद्राने पाठवलेले पैसे १००%  येऊ लागले ( राजीव गांधी स्वतः म्हणत की आम्ही पाठवलेल्या पैशातील केवळ १५% पैसे शेवटच्या लाभार्थीला मिळतात ) . रस्ते ही खूप छान होऊ लागले आहेत . घरोघरी चुलीच्या धुरात स्वैपाक करणाऱ्या स्रियांना घरगुती गॅस सहज मिळू लागला ...
पाकिस्तान वर आपल्या सैन्याने केलेल्या सर्जिकल हल्ल्याने प्रत्येक भारतीयांचा उर अभिमानाने भरून आला ..
उठसुठ कुठेही होणारे दहशतवादी हल्ले आता थांबले आहेत ...
 अलीकडे मी गावाकडे गेलो तर जवळपास प्रत्येक दुकानदार डिजिटल पेमेंट स्वीकारत आहे ...ही एक मोठी क्रांती झाली आहे ...दुसऱ्या टप्प्यात प्रभू श्रीराम मंदिराचे काम मार्गी लागले आहे ...काश्मीरचा प्रश्न सुटत आहे ...नुकताच काशी विश्वनाथ बाबा मंदिर व परिसर आधुनिक केला गेल्याचे वृत्त आपण सगळ्यांनी बघितला वा वाचलाच आहे ...हिंदूंना त्यांचा मानसन्मान परत मिळत आहे ..
देवांची पुनर्स्थापना होत आहे , ही खूप आनंदाची बाब आहे . 

 *उद्याचा भारत कसा असेल ?* 

सावरकरांनी ही संकल्पना खूप सुंदर मांडली आहे व त्याच पथावर सध्याच्या सरकारांनी पावले टाकावी .  
१ .  उद्याच्या भारतात समान नागरी कायद्याचे राज्य असेल ..हिंदू केवळ बहुसंख्य आहेत म्हणून स्वतःला कुठलेही स्पेशल अधिकार मागणार नाहीत . तसेच सर्वांची देशाप्रती असलेली कर्तव्ये ही समान असतील . 
२ .उद्याच्या भारतात- सर्व धर्म वा जातींना एकाच पातळीवर आणून ठेवले जाईल .केवळ *गुणवत्तेच्या* आधारावर उन्नती केली जाईल .
३ .उद्याच्या भारतात - सर्वांना प्रत्येक गोष्टीची किंमत मोजायला शिकविले जाईल व *फुकट* वा *मोफत* ची सवय कशी सोडून द्यावी हे शिकवले जाईल .
४ .उद्याच्या भारतात - धर्माच्या आधारावर देशाचे अजून नवीन तुकडे होणार नाही याची काळजी घेतली जाईल व देशद्रोही व्यक्तींना वा समूहांना वेळीच योग्य ती कठोर शिक्षा दिली जाईल .
५. उद्याच्या भारतात - भारतीय *शेतकरी* नुसताच शेतीवर अवलंबून न राहता शेतीचे आधुनिक शिक्षण घेऊन इतरही अनेक क्षेत्रात कामे करेल व आत्महत्या न करता इतरांना ' *जगावे कसे* ' याचे नवीन  आदर्श घालून देईल . 
६ . आणि शेवटी उद्याच्या भारतात आपले खरे  हिरो आपले शिक्षक , वैज्ञानिक , आपले सैनिक हेच आहेत हे नव्या पिढीला ठसवले जाईल . 

 असा हा माझा उद्याचा भारत हा अहिसेंच्या भोंगळ तत्वज्ञानावर चालणारा भारत राहणार नाही तर एक *शस्रसंपन्न* व *विज्ञानाच्या* वाटेवर चालणारा समृद्ध भारत असेल ! 

जयहिंद!
भारतमाता की जय ! !

धन्यवाद!

© हेमंत सदाशिव सांबरे
२४.१२.२०२१, पुणे .
संपर्क -९९२२९९२३७० .

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

सावरकर का नको ?

नगरी भाषा - माझी मायबोली-हेमंत सांबरे

#इस्रायल आणी स्वातंत्र्यवीर सावरकर