सावरकरांचा स्रियांविषयी दृष्टीकोन व विचार !

सावरकरांचा स्रियांबद्दलचा दृष्टिकोन !

हे वर्ष १९२४ 
आजपासून बरोबर ९८ वर्षांपूर्वी ! सावरकर नाशिक येथे आले असताना त्यांच्या एका स्रियांच्या सभेतील भाषण खाली मी जोडले आहे . 
त्यावेळी मांडलेले क्रांतिकारक विचार वाचा 

१ .स्रियांसाठी अशक्तपणा नव्हे तर सशक्तपणा हेच सौंदर्य 

२. झाशीच्या राणीचा पराक्रम , सीतेचा त्याग हे आपले आदर्श असावेत

३ .मुलगा हवा , मुलगी नको ही मानसिकता चुकीची ! (आजही अशीच स्थिती आहे ) मातांनी मुलीचे हे पालन व्यवस्थित करावे असे सावरकर मांडतात ( सावरकरांनी आपल्या मृत्युपत्रात स्वतःच्या मुलीला ही संपत्तीचा समान भाग दिला - तेव्हा कायदा तसा नव्हताही ! ) 

४ . आजकाल मुलीच्या विवाहाचे वय २१ व्हावे असा कायदा येत आहे किंवा आला आहे .. सावरकर तेव्हा सांगतात " योग्य वय येईपर्यंत मुलीचा विवाह करू नये " .

५ . शारीरिक शक्तीप्रमाणे मुलींना बौद्धिक व शालेय शिक्षण ही दिले पाहिजे .

तर असे होते वीर सावरकर ! जशी उक्ती तशीच कृती ! शिवाय प्रत्येक गोष्टीत दूरदृष्टी तरी किती व प्रत्येक समस्येचा इतका सूक्ष्म अभ्यास ! 

आजही आपल्यातील कित्येक सुशिक्षित लोकही मुलींना अजूनही समानतेने व सन्मानाने वागवत नाही . 

म्हणूनच हे समाजक्रांतिकरक सावरकर मला तरी खूप भावतात ! 

संदर्भ -स्वातंत्र्यवीर सावरकर 
रत्नागिरी पर्व - बाळाराव सावरकर 
(१९२४ ते १९३७ ) 

©हेमंत सांबरे
संपर्क -९९२२९९२३७० .

Comments

Popular posts from this blog

सावरकर का नको ?

नगरी भाषा - माझी मायबोली-हेमंत सांबरे

#इस्रायल आणी स्वातंत्र्यवीर सावरकर