सावरकरांचा स्रियांविषयी दृष्टीकोन व विचार !
हे वर्ष १९२४
आजपासून बरोबर ९८ वर्षांपूर्वी ! सावरकर नाशिक येथे आले असताना त्यांच्या एका स्रियांच्या सभेतील भाषण खाली मी जोडले आहे .
त्यावेळी मांडलेले क्रांतिकारक विचार वाचा
१ .स्रियांसाठी अशक्तपणा नव्हे तर सशक्तपणा हेच सौंदर्य
२. झाशीच्या राणीचा पराक्रम , सीतेचा त्याग हे आपले आदर्श असावेत
३ .मुलगा हवा , मुलगी नको ही मानसिकता चुकीची ! (आजही अशीच स्थिती आहे ) मातांनी मुलीचे हे पालन व्यवस्थित करावे असे सावरकर मांडतात ( सावरकरांनी आपल्या मृत्युपत्रात स्वतःच्या मुलीला ही संपत्तीचा समान भाग दिला - तेव्हा कायदा तसा नव्हताही ! )
४ . आजकाल मुलीच्या विवाहाचे वय २१ व्हावे असा कायदा येत आहे किंवा आला आहे .. सावरकर तेव्हा सांगतात " योग्य वय येईपर्यंत मुलीचा विवाह करू नये " .
५ . शारीरिक शक्तीप्रमाणे मुलींना बौद्धिक व शालेय शिक्षण ही दिले पाहिजे .
तर असे होते वीर सावरकर ! जशी उक्ती तशीच कृती ! शिवाय प्रत्येक गोष्टीत दूरदृष्टी तरी किती व प्रत्येक समस्येचा इतका सूक्ष्म अभ्यास !
आजही आपल्यातील कित्येक सुशिक्षित लोकही मुलींना अजूनही समानतेने व सन्मानाने वागवत नाही .
म्हणूनच हे समाजक्रांतिकरक सावरकर मला तरी खूप भावतात !
संदर्भ -स्वातंत्र्यवीर सावरकर
रत्नागिरी पर्व - बाळाराव सावरकर
(१९२४ ते १९३७ )
©हेमंत सांबरे
संपर्क -९९२२९९२३७० .
Comments
Post a Comment