#सावरकर आणि मंगेशकर


#सावरकर आणि मंगेशकर 

लता मंगेशकर यांचे वडील श्री दिनानाथ मंगेशकर स्वातंत्र्यवीर सावरकर यांना नेहमी भेटत असत .सावरकर रत्नागिरी येथे स्थानबद्ध असताना त्यांच्या नाट्य प्रयोगांच्या निमित्ताने त्यांच्या भेटी होत असत .
वीर सावरकरांनी ' संन्यस्त खड्ग ' नावाचे नाटक श्री दिनानाथ मंगेशकर यांच्या " बलवंत संगीत मंडळी " साठी लिहले होते व ज्याचा पहिला प्रयोग मुंबई येथे १८ सप्टेंबर १९३१ रोजी झाला होता ..लतादीदी तेव्हा फक्त दोन वर्षांच्या होत्या .
(संन्यस्त खड्ग -पहिला प्रयोग) 
पुढे दिनानाथ जेव्हा रत्नागिरीला येत , तेव्हाही ते सावरकरांची भेट घेत ..एकदा तर दिनानाथ , लतादीदी व सावरकर एका हरिजन वस्तीमध्ये सहभोजनास एकत्र गेले होते , म्हणजे हे संस्कार मंगेशकर कुटुंबियांवर अगदी पहिल्यापासून होते असे दिसते .
पुढे सावरकर रत्नागिरीहून मुंबईस " सावरकर सदन " येथे राहावयास आले . मंगेशकर कुटुंबीय ही कालांतराने मुंबई येथेच स्थायिक झाले .तेव्हाही लतादीदी व त्यांची भावंड वारंवार सावरकरांच्या घरी जात असत .वीर सावरकरांना माई (लतादीदी यांची आई ) च्या हातची खिचडी खूप आवडतं असे . 

लता मंगेशकर या स्वातंत्र्यवीर सावरकर या विषयावर बोलताना कायमच भावनिक होताना दिसतात .. त्या सावरकरांना वडिलांच्या जागी मानत व पुर्ण मंगेशकर कुटुंबीय अक्षरशः सावरकरांचे भक्त होते व हे त्यांनी कधीही लपवून ठेवले नाही , किंबहुना हे नाते त्यांनी अभिमानाने मिरवले .

तो काळ काँग्रेस चा होता व सावरकरांसाठी प्रतिकूल असाच होता ..सावरकर व त्यांचे कुटुंबीय यांच्याशी आपले नाते आहे असे सांगणे हे सुध्दा वरच्या सत्ताधारी लोकांशी वैर ओढवून घेण्यासारखे होते ..तरीही मंगेशकर ठाम होते असे दिसते .

मग ते सावरकरांनी सावधगिरी ची सूचना देऊनही " ने मजसी ने " या गीताला हृदयनाथ मंगेशकर यांनी  चाल देणे असो ( या कृत्यामुळे हृदयनाथ मंगेशकर यांनी आपली आकाशवाणी वरील नोकरी गमावली ) , किंवा लतादीदी , उषादीदी वा या सर्वांनी वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकरांचा गौरवाने उल्लेख करणे असो , मंगेशकर त्यावर ठाम होते .
यावरून  असे दिसते ,
-----------------------------------------------------------------
१ . स्वातंत्र्यवीर सावरकर हे प्रचंड प्रभावी व्यक्तिमत्त्व होते . चांगले व  सच्चे लोक कायमच त्यांच्या संपर्कात राहणे पसंद करत ..म्हणजेच बाकी सारे काही आम्हाला  गमवावे लागले तरी चालेल पण आम्ही सावरकर सोडणार नाही .
२ . मंगेशकर कुटुंबियांना सावरकर कोणत्या कारणासाठी जगले व कसे जगले याची पक्की जाणीव होती , त्यामुळेच त्यांना सावरकर हवेसे  व आदरणीय वाटत .
३ . सावरकरांच्या संपर्कात आलेला प्रत्येक चांगल्या मनाचा व देशभक्त व्यक्ती सावरकरांचा च होऊन जात असे , हे मंगेशकर कुटुंबाच्या उदाहरणावरून लक्षात येते .

हे  व्हिडिओ आता चांगला च viral झाले आहेत , पण हे मी जे लिहले त्याचा visual अनुभव घ्यायचा असेल तर नक्की बघा

लता जी , सावरकरांबद्दल बोलताना
https://youtu.be/VEkm8M8XICM

हृदयनाथजी आपला अनुभव सांगताना
https://youtu.be/G72DADnKXzY

भारताचे सध्याचे पंतप्रधान नरेंद्र जी मोदी कालच्याच राज्यसभेतील भाषणात हृदयनाथ यांना कशी वागणूक मिळाली हे सांगताना 
https://fb.watch/b2gzEPi_3C/

© हेमंत सांबरे 
०९.०२.२०२२. 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

सावरकर का नको ?

नगरी भाषा - माझी मायबोली-हेमंत सांबरे

#इस्रायल आणी स्वातंत्र्यवीर सावरकर