२०१४ नंतर भारतात दहशतवादी हल्ले व बॉम्बस्फोट कमी कसे व का झाले ?

येत्या दोन वर्षांत संपूर्ण पाकिस्तान आणि बांगलादेश सीमा कुंपण घालून सुरक्षित केली जाईल.

आत्तापर्यंत, सीमेचा 1100 किलोमीटर परिसर 'फ्लडलाइट्स'ने कव्हर करण्यात आला आहे. संपूर्ण सीमा उजळवून टाकण्यात येणार आहे.

बीएसएफ च्या 542 नवीन सीमा चौक्या आणि सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी 510 ऑब्झरवेशन पोस्ट चे टॉवर बांधण्यात आले आहेत. 

पहिल्यांदाच हरामी नाला परिसरात निरीक्षण मनोरे बांधण्यात आले आहेत. 

637 बीएसवफ चौक्यांवर वीज आणि सुमारे 500 ठिकाणी पाण्याची जोडणीही देण्यात आली आहे. 

याशिवाय 472 ठिकाणी सोलर प्लांट बसवून सीमेवर रक्षण करणाऱ्या बीएसएफ जवानांची सोय सुनिश्चित करण्यात आली आहे.

बीएसएफने गेल्या 5 वर्षांत तब्बल 30000 किलोग्रामहून अधिक अमली पदार्थ जप्त केले आहेत. अंमली पदार्थ देशाच्या भावी पिढीला पोखरतात पण त्यातून निर्माण होणारा पैसा देशांतर्गत दहशतवादालाही आर्थिक रसद पुरवत असतो आणि शस्त्रास्त्रांची तस्करी करण्यासाठीही वापरला जातो.

सीमा सुरक्षा दलाने 2500 हून अधिक शस्त्रे हस्तगत केली आहेत, तर 90 हून अधिक परदेशी ड्रोन पाडले आहेत. 

नवी दिल्लीत ड्रोन आणि सायबर फॉरेन्सिक लॅबची स्थापना करून संशोधन आणि विकास क्षेत्रात खूप चांगले काम सुरू आहे. 

केंद्र सरकारने बीएसएफ ला फील्ड फॉर्मेशनसह 100 ड्रोन प्रदान केले आहेत.
_______________

तो दिवस दूर नाही जेव्हा देश डाव्या देशद्रोही दहशतवादापासून, अर्थात नक्षलींच्या प्रभावातून पूर्णपणे मुक्त होईल. गेल्या 10 वर्षांत नक्षली हिंसाचाराच्या घटना 52 टक्क्यांनी तर मृत्यूच्या घटना 70 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत.

नक्षलवाद प्रभावित जिल्हे एकेकाळी 200+ होते, ते 45 वर आले आहेत. 

नक्षलवाद प्रभाव असलेल्या पोलिस ठाण्यांची संख्या एकेकाळी 800+ होती, ती आता 176 वर आली आहे.
________________

मोदी सरकारने (CAPF) निमलष्करी दलांच्या 13000 सैनिकांना घरे दिली आहेत. 

त्यांच्यासाठी 113 नवीन बॅरेक बांधल्या आहेत.

लवकरच या निमलष्करी दलांच्या जवानांना आणखी 11000 घरे दिली जातील आणि 108 बॅरेक देखील बांधल्या जातील. 

या वर्षाअखेरीस गेल्या 5 वर्षातील 24000 हून अधिक निमलष्करी दलांच्या जवानांना घरे देण्याचे काम पूर्ण होईल. 

याशिवाय, सीएपीएफ ई-हाऊसिंग पोर्टलद्वारे 70000 हून अधिक सैनिकांना घरांचे वाटप करण्यात आले आहे ते वेगळे!

वरील सर्व माहिती आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बीएसएफ च्या 59व्या स्थापना दिनाच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात दिली.
_________________

घुसखोरी, तस्करी आणि देशांतर्गत दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी प्रभावी सीमा व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. काँग्रेस सत्तेवर असताना देशाने पाहिलेले असंख्य दहशतवादी हल्ले आणि बॉम्बस्फोट, 2014 पासून थांबले आहेत ते याचमुळे. सुरक्षित सीमा आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी एक विश्वासाचे वातावरण निर्माण करतात. जेव्हा देशांना त्यांच्या सीमांच्या सुरक्षिततेबद्दल आणि अखंडतेबद्दल खात्री असते, तेव्हा गुंतवणूकदार आपला पैसा त्या देशात टाकतो. परिणामी आर्थिक वाढ आणि व्यवसायाच्या संधी वाढतात.

देशाच्या तिजोरीतील पैशांतूनच आपल्या सैनिकांची चांगली काळजी घेतली जाते आणि बॉर्डर सुरक्षित ठेवल्या जातात. तेंव्हा, लक्षात ठेवा : जर तुम्ही एक लिटर पेट्रोल गाडीत टाकत असाल किंवा खरेदीवर जीएसटी भरत असाल, तर तो पैसा कुठे जातो? एक चमन म्हणतो अदानी-अंबानी ला जातो..🤣 नाही, तुमच्या टॅक्स चा पैसा त्या जवानाच्या कल्याणासाठी जातो, जो तुमच्या-माझ्या सुरक्षेसाठी स्वतःच्या घरादारापासून, संसारपासून, मुलाबाळांपासून लांब तिकडे बॉर्डर वर डोळ्यात तेल टाकून भक्कमपणे आपलं राखण करत उभा आहे!

जय हिंद!

- वेद कुमार.

Comments

  1. खूप छान ..माहितीपूर्ण..धन्यवाद

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सावरकर का नको ?

नगरी भाषा - माझी मायबोली-हेमंत सांबरे

#इस्रायल आणी स्वातंत्र्यवीर सावरकर