#हिंदूंची व्होट बँक व भविष्यातील नांदी !






#हिंदूंची व्होट बँक व भविष्यातील नांदी! 


हिंदूंची व्होट बँक तयार होत आहे . मध्येच काही वेळा काँगेस कडे जाणारे हिंदू परत तोच कटू अनुभव घेऊन परत येत आहेत . अर्थात भाजपाच आपले सर्व काही भले करील , अशा भ्रमात हिंदू नाहीत . पण काँगेस प्रमाणे आपले नुकसान करणार नाही ,हा विश्वास हिंदूंना नक्कीच वाटतो . 

लवकरच प्रभू श्रीराम यांचे भव्यदिव्य मंदीर तयार होत आहे . हिंदूंचे हे गेल्या ५०० पेक्षा जास्त वर्षांचे स्वप्न होते , जे मोदी सरकारच्या काळात पूर्ण होत आहे . काश्मीर मध्ये ३७० कलम हटवून तेथे अतिशय महत्वाचे बदल होत आहेत . जरी अजूनही बरेच काम बाकी असेल , पण सुरुवात झाली आहे . 

भारतीय जनतेने तब्बल ७० वर्षे काँगेस वर विश्वास दाखविला होता . त्या काळात हिंदू हितांची कामे झाली नाहीत , हे सत्य आहे . म्हणूनच भाजपला सलग २०१४ , २०१९ साली सत्तेत पूर्ण बहुमत मिळाले . 
बहुमत असेल तर  बरीच कामे करता येतात हे प्रत्यक्ष अनेक कामे करून मोदी सरकारने सिद्ध करून दाखवले . 
आता २०२४ चे पडघम वाजू लागले आहेत . अशावेळी तीन महत्वाच्या राज्यांत भाजपने विजय मिळवला आहे . २०२४ मध्ये होणाऱ्या महाविजयाची ही नांदी असेल . तरीही हिंदूंनी आपल्या व्होट बँकेचा दबाव भाजपा वर कायम ठेवला पाहिजे .

जगात इतर  धर्मियांनी स्वतःचे अनेक देश निर्माण केले आहेत . हिंदूंचे स्वतःचे असे हक्काचे एकही राष्ट्र नाही . जोपर्यंत इतर धर्म स्वतःचा " धर्म " म्हणून सांगत आहेत , तोपर्यंत हिंदूंनी ही आपल्या धर्माचा अभिमान सोडू नये . लोकशाहीत बहुमत ही खूप मोठी ताकद असते . त्यामुळे पुढच्या निवडणुकीत भाजपला ३५०+ जागा देऊन , हिंदूंनी स्वतःच्या तीन मुख्य मागण्या पुढे रेटल्या पाहिजे ,असे मला वाटते

१ . भारतात जनसंख्या नियंत्रण कानुन लवकरात लवकर आणला पाहिजे
२. समान नागरी कायदा लागू करणे .
३ .हा देश हिंदुराष्ट्र आहे हे स्पष्ट जाहीर करने व तशी तरतूद करून त्यासाठी कायदा करणे . हिंदूंच्या हिताचे इतर अनेक कायदे करणे .

लोकशाहीत आपल्या व्होट मध्ये खूप ताकद आहे . हिंदूंनी आता ओळखली आहे , त्याचा वापर आता लोकसभेत ही केलाच पाहिजे व करताना आपल्याला काय हवे हे ही आपल्या नेत्यांपर्यंत स्पष्टपणे पोहोचविणे गरजेचे आहे . 

भाजपला या तीन राज्यांत विजय का मिळाला ? 
आता काही विश्लेषण . 
माझे मित्र वेद जी यांच्या पोस्टच्या मदतीने खालील आकडेवारी आली आहे 👇👇

1.) मध्य प्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान आणि तेलंगणा या चार राज्यांमधील 2018 च्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला एकूण 299/638 जागा मिळाल्या होत्या आणि भाजपला 198/638 जागा मिळाल्या होत्या. आज 2023 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 337/638 अर्थात (+)139 जागा जास्त मिळाल्या आहेत, तर काँग्रेसला 234/638 जागा मिळाल्या आहेत अर्थात (-)65 जागा काँग्रेसने गमावल्या आहेत. 2024 लोकसभा निवडणुकीत भाजपचा अश्वमेध रोखण्याची काँग्रेसची लायकी नाही हे आज स्पष्ट झालं आहे.

2.) 2018 विधानसभा निवडणुकीत या चार राज्यांमध्ये स्कोर होता भाजप 0 आणि काँग्रेस 3, तर 2023 विधानसभा निवडणुकीचा स्कोर आहे भाजप 3 (या तिन्ही ठिकाणी काँग्रेस जिंकली होती) आणि काँग्रेस 1. त्यात 2019 लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढ जिंकूनही काँग्रेस पक्ष लोकसभेत कसाबसा 50 चा आकडा गाठू शकला होता, आता तर त्याचेही वांदे होणार आहेत हे स्पष्ट आहे. 

3.) भाजपचा व्होट-शेयर या चारही राज्यांमध्ये वाढला आहे. मध्यप्रदेश मध्ये 7.81%, छत्तीसगढ मध्ये 13.03%, राजस्थान मध्ये 3.85% तर तेलंगणात 6.89% अशी भाजपची मतांची टक्केवारी वाढली आहे. काँग्रेसची मतांची टक्केवारी मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि राजस्थान या तिन्ही राज्यात घटली आहे, केवळ तेलंगणात मतांची टक्केवारी वाढली आहे. तेलंगणात भाजपची टक्केवारी पण वाढलेली असल्याने, काँग्रेसने भाजपचे नाही तर बिआरएस ची मते घेतली हेच दिसत आहे. 

4.) चोऱ्यामाऱ्या करणारे लुटारू, जनताद्रोही आणि असंवेदनशील सरकार एखाद्या राज्यात सत्तेत आले, आणि 'बाप का राज' समजून असे माजलेले सत्ताधारी जनतेच्या जीवावरच उठलेले असतील.. तर, केंद्रातील सरकारने त्या राज्याच्या जनतेला वाऱ्यावर सोडू नये. 'साम दाम दंड भेद' वापरून अशा राज्याला लागलेल्या पनवती मधून जनतेला मुक्त करणे हे केंद्र सरकारचे कर्तव्यच आहे. मध्यप्रदेश मध्ये भाजपने लोकांना अशाच पनवती मधून मुक्त केल्याचा परिणाम आज आपण पाहत आहोत, की जनतेने भाजपला 2/3 बहुमत दिलं आहे. 'फोडाफोडीचे राजकारण जनता खपवून घेणार नाही', 'ही आपली राजकीय संस्कृती नाही' वगैरेच्या पाणचट बोलबच्चन ना जनता बळी पडत नाहीये. काही कारस्थानी लोकांनी (केवळ आकडेवारी जुळवता आली म्हणून) जनादेश नसलेले एक जनताद्रोही सरकार सत्तेत आणले, तर असे सरकार मुकाट्याने पाच वर्षे उरावर घेऊन रडत बसावं का जनतेने? अशा वेळी, भाजपने सत्ताधारी लोकांमधील काही चांगल्या लोकांना त्यांच्या 'अंतर्मनातील आवाज' ऐकून योग्य निर्णय घेण्याचे अपील केले, तर त्याचे जनताही स्वागतच करते यावर शिक्कामोर्तब करणारा पण हा निकाल आहे.

या तीन राज्यांतील निकालांवरून खूप चर्चा होत राहतील . मी माझी मते मांडली आहेत , आपलीही मते असतील . राजकारण ही अशी गोष्ट आहे की ज्यापासून सामान्य जनतेने दूर न राहता आपली मते मांडली पाहिजेत . कारण राजकारण हे आपल्या रोजच्या जीवनाशी निगडित असते , त्याला टाळून आपल्याला पुढे जाता येत नाही .
हिंदू राजकीय दृष्ट्या ही आता जागरूक होत आहे , ही स्वागताची गोष्ट आहे . पुढे भविष्यात ही असेच जागे राहून आपल्याला जे हवे ते आपण या बहुमत देत असलेल्या पक्षाकडून करवून घेतले पाहिजे . 

भारतमाता की जय!
जयहिंद ! 

Comments

  1. Replies
    1. हेमंत छानच. हे हिंदवी स्वराज्य व्हावे हीच श्रीं ची इच्छा.

      Delete
    2. वरील संदेश नितीन मुळीक भा ज प सदस्य पुणे

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

सावरकर का नको ?

नगरी भाषा - माझी मायबोली-हेमंत सांबरे

#इस्रायल आणी स्वातंत्र्यवीर सावरकर