माझी जन्मठेप - आत्मकथा - वीर सावरकर - पुस्तक परीक्षण
आत्ताच माझी जन्मठेप वाचून हातावेगळे केले. हे पुस्तक वाचण्याची नक्की कितवी वेळ आहे , हे मलाही आठवत नाही . इतक्या वेळा वाचूनही यावर लिहण्याची तीव्र ऊर्मी मात्र यावेळी खूप अशी दाटून आली आहे . हे पुस्तक वाचून मला समजले आहे , ज्या ज्या भावना माझ्या मनाला व्यापून राहिल्या आहेत त्या त्या(शक्यतो) सगळ्याच गोष्टी तुम्हाला ही कळाव्यात अशी माझी प्रामाणिक इच्छा झाली आहे .. मी या आत्मकथेचे शेवटचे पान आत्ता उलटत आहे . अनेक वेळा सुटकेचे वृत्त येऊनही याआधी प्रत्यक्ष सुटका कधीही न मिळालेले सावरकर यावेळी मात्र खरेच आपली सुटका होणारच ,हे कळून खूप भावनिक झालेले आहेत . वाचक म्हणून आपल्याही मनात अनेक संमिश्र भावना दाटून येतात . या जन्मठेपेचे शेवटचे वृत्त वाचताना माझेही डोळे पाण्याने भरून आले आहे . पण हे कदाचित आनंदाश्रू आहेत , कारण या माझ्या कथेच्या नायकाची सगळ्या यातना मधून सुटका होत आहे म्हणून येणारे ते डोळ्यांतील अश्रू आहेत . दुसऱ्या बाजूने या दिव्य पुस्तकाची इतिश्री झाल्याने , आपण आता या पुस्तकापासून दुरावणार याचेही दुःख असेल का ? म्हणूनच अश्रू येत आहेत का ...