#छावा चित्रपट मनोगत
प्रथम श्री लक्ष्मण उतेकर यांच्या धाडसाचे मनापासून कौतुक .. त्यांनी निर्भयपणे सत्य दाखवले आहे .
पराक्रमी संभाजी राजेंचा इतिहास खरोखर पिढ्यान् पिढ्यानं प्रेरणादायी आहे . आपल्या भारतात हिंदू धर्म का टिकून राहिला याचे सर्वात मोठे श्रेय जर द्यायचे असेल तर ते संभाजी महाराज यांच्या बलिदानाला जाते .
दिग्दर्शक उतेकर यांनी मध्ये मध्ये काही वाक्य पेरून सर्वधर्मसमभावाचा तडका दिला असला तरी , हा चित्रपट अंतिमतः योग्य तो परिणाम साधून जातो व झोपलेल्या हिंदूनी ( आता तरी ) जागे व्हावे असा संदेश नक्कीच देतो .
औरंगजेबाच्या हातात जे जे कुणी काफिर सापडले त्या त्या सगळ्यांचा त्याने अशाच प्रकारे छळ केला आहे . त्यामुळे संभाजी महाराज त्याच्या तावडीत दुसऱ्या वेळी ( पहिल्यांदा आग्र्यात ) सापडल्यावर तो त्यांना सोडणार नव्हताच , पण ज्या धीरोदात्त वृत्तीने राजे मरणाला सामोरे गेले ते बघून त्याला मारणारा हा क्रूरकर्मा औरंगजेब स्वतःही नक्कीच धास्तावला असावा .
शेवटची संगमेश्वर येथे झालेली लढाई हा या चित्रपटाचा सर्वोच्च बिंदू असावा .. केवळ दीडशे मावळे विरुद्ध पाच हजार मुघल सैन्य अशी ती विषम लढाई होती . येथे एक मनात विचार आला की संभाजी महाराज यांच्या जागी जर शिवाजी महाराज अशा प्रसंगात सापडले असते तर, कदाचित त्यांनी भावनिक न होता तेथून निसटून जाण्याचा असा एखादा वेगळा निर्णय घेतला असता का ? अर्थात हा सगळा इतिहास .. या सगळ्या आपल्यासाठी आज जर तर च्या गोष्टी !
विकी कौशल म्हणजे एक अद्भुत अभिनेता आहे . संभाजी महाराज जर कसे असतील तर ते असेच , हे त्याने त्याच्या देहबोलीतून , संवाद फेकीतून अगदी तंतोतंत दाखवले आहे . त्यामुळे यापुढे ही कोणी जर संभाजी महाराजांची भूमिका करू पाहिली तर तुलना विकी कौशल च्या अभिनयाबरोबर होईलच!
मनात विचार येतो की पूर्वीचे काँग्रेस सरकार असते तर अशा चित्रपटांना परवानगी तरी मिळली असती का ?
मोदींचे सरकार असल्याचा हा एक फायदा नक्कीच होतोय . अर्थात आपल्या अजून खूप साऱ्या अपेक्षा आहेत , हे ही खरे !
मधल्या बऱ्याच मोठ्या काळात पुरेसे संशोधन झालेले नसल्याने वीर संभाजी राजांचा खरा इतिहास भारतीय लोकांपर्यंत आला नव्हता. या चित्रपटाच्या माध्यमातून आपले छत्रपती संभाजी महाराज पूर्ण भारतात पोहोचले आहेत .
खरे तर संभाजी महाराज यांच्या बलिदानानंतर औरंग्याला याच भूमीत गाडेपर्यंत नेमके काय काय घडले , प्रत्येक मराठ्याच्या घराघरात कसा स्वातंत्र्य अग्नी पेटला असावा यावर ही चित्रपट आला पाहिजे . तो काळ ही खूप संकटाचा होता , पण ज्याप्रकारे मराठ्यांनी मुघल साम्राज्याचे तुकडे तुकडे केले ते ही नवीन पिढीला कळले पाहिजे .
शेवटी एकच म्हणावेसे वाटते ,
देश धरम पर मिटने वाला, शेर शिवा का छावा था
महापराक्रमी परम प्रतापी, एक ही शंभू राजा था
© हेमंत सांबरे
१२ मार्च २०२५ .
खुप छान सर
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteखरच खूप छान लिहिलंय. आपण भारतीय जनता पक्षाला निवडुन दिल्यामुळेच गेली 11-12 वर्ष चांगली गेलीत.
ReplyDelete