Posts

Showing posts from April, 2022

बामण लोकांचा द्वेष करण्याचे फायदे(च फायदे !)

Image
                   *बामण लोकांचा द्वेष करण्याचे फायदे (च फायदे !* ) हे अगदी आम्ही लहानपणापासून बघत आलो आहोत .. तुम्ही ही नक्कीच बघितले , अनुभवले वा स्वतःही केले असेल ! काहीच हरकत नाही , करायलाच पाहिजे !!  अहो मला सांगा ज्यात फायदा आहे अशी गोष्ट तर आपण न चुकता करायलाच पाहिजे . किंबहुना वडीलधारी मंडळी हेच शिकवतात , की फायदा असला की व ती गोष्ट करताना जर कुठलाही धोका संभवत नसेल तर करायला काहीच अडचण नसते / नसावी .  आता मुद्दयावर येतो ! बघा या जातीला शिव्या कशा दिल्या पाहिजे , भटूरड्या शेंडी-जानवे वाला  बामन भट ( इथे ब्राह्मण हा योग्य उच्चार आहे ,पण माहीत असूनही मुद्दाम बामन म्हणायचे , त्याने समाजात आपले वजन वाढते )  फुकटे  "बामन भट , अंडे खातो सटासट" "बामन खातो खूप खूप  शेंडीला चोळतो शेरभर तूप " ( आमच्या लहानपणी हे म्हणून चिडवले जायचे )  या अशा शिव्या व इतर बऱ्याच शिव्या या ब्राह्मण ( Sorry बामन ) लोकांना दिल्याच पाहिजे , तो आपला हक्कच आहे ... कारण सांगतो हे लोकं ना , एक नंबरचे बावळट आहेत बरं का ...

हनुमंत व प्रभू श्रीराम यांची शेवटची भेट !

Image
हनुमंत व प्रभू श्रीराम यांची शेवटची भेट !! हनुमान व प्रभू श्रीराम यांना वेगळे करून कसे चालेल ? प्रभूंच्या आयुष्यात अनेक भूमीका निभावणार्या हनुमानाचे  त्यांच्या वर निस्सीम प्रेम होते  , यात  ✍️रामायणाची एक कथा आहे. अगदी शेवटाकडची. रामाचं अवतार कार्य संपलेलं असतं म्हणून काळ त्यांना घ्यायला आलेला असतो. पण तो आयोध्येच्या बाहेरच थांबून राहतो. वेळ जात राहतो, पण काळ काही आयोध्येमध्ये प्रवेश करीत नाही. ब्रम्हदेवांना प्रश्न पडतो की काळ असं का करतोय. ते त्याला विचारतात. काळ म्हणतो, "हनुमान राखी राम, जाऊ कसा आत, जीवाचे गा भय, जीवाहून थोर!" ब्रम्हदेव काय समजायचे ते समजतात आणि रामाकडे जातात. ते रामाला सांगतात ''काळाचाही काळ तुझा हनुमान... वाटे लाव त्याला, खूप लोटलासे काळ" प्रभू श्रीराम विचारांती, हनुमानाला जवळ बोलवतात. नकळतच त्यांचे डोळे भरून येतात. युगायुगाच्या या सोबत्याला सोडून जाणं त्यांच्यासाठी अवघड असणार असतं. हनुमानाला त्याच्या धन्याची ही अवस्था का झाली ते कळू शकत नाही. तो प्रश्न विचारायला तोंड उघडणार एवढ्या रामाच्या हातातली एक अंगठी जमिनीवर पडते आणि हळुहळू...

Self Image म्हणजे काय व ती कशी वाढत जाते ! - हेमंत सांबरे

Image
*Self Image  म्हणजे काय व ती कशी वाढते  !*  -हेमंत सांबरे  हा विषय अतिशय महत्वाचा असूनही मराठी लोकांमध्ये/वाचकांमध्ये हा विषय तितकासा चर्चा केला गेलेला नाही किंवा थोडासा दुर्लक्षित आहे , असे मला वाटते . गेल्या अनेक वर्षांपासून केलेले वाचन व प्रत्यक्ष जे अनुभव मला आले आहेत त्यावरून मी हे मांडण्याचा प्रयत्न करतो . वाचकहो ! यात असा उपदेश वगैरे असे काही नसून , सोप्या पद्धतीने हे समोर आले पहिजे असे मनापासून वाटले म्हणूनच लिहतोय  , आपणास आवडेल याची मी खात्री देतो. सेल्फ इमेज म्हणजे मला स्वतःबद्दल काय वाटते , किंवा मी स्वतःला नक्की काय समजतो ? किंवा स्वतःबद्दल च्या माझ्या काय भावना आहेत इ इ .  खूप जास्त आत्मविश्वास असणे व जास्त सेल्फ इमेज असणे या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत . जास्त आत्मविश्वास हा कदाचित फाजील असू शकतो पण सेल्फ इमेज ही अनेक गोष्टींचा एकत्र अर्क असू शकते .  त्यामुळे बऱ्याच क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी नुसता खूप जास्त आत्मविश्वास पुरेसा नाही तर सेल्फ इमेज  असावी लागते , या सेल्फ इमेज ला  प्रयत्नपूर्वक वृद्धिंगत करावे लागते ....

आकाराने छोट्या , काही मोठ्या गोष्टी !

१ -- सिग्नलवर उभ्या असलेल्या एका फकीराने हात पुढे केले. मी खिसे तपासले तर फक्त हजाराची नोट निघाली. मी त्याला देऊन टाकली. बाबा सांगायचे साधू-फकीराला रिकाम्या हाती धाडू नये. तेव्हा मी विचारलेलं, "तो स्वस्थ, हट्टाकट्टा असला तरीही?" त्यावर बाबांनी हजरत अली साहेबांचं एक वचन ऐकवलेलं, "देवाने आपल्याला आपल्या लायकीपेक्षाही खूप दिलेलं असतं." दुसऱ्या दिवशी मला पुन्हा त्या सिग्नलला थांबावं लागलं. आणि मी पाहिलं.. कालचा भीक मागणारा फकीर आज नारळ विकतो आहे. ●●●●● २ -- "माझी तीन मुलं आहेत. ते नेहमी एकत्र राहावेत. म्हणून मीे तीन मजली घर बांधलं," असं आमचा बाप म्हणायचा.  तो गेल्यावर आम्ही हे घर विकायला काढलं. आम्ही तीन भाऊ ना एकत्र राहू शकतो, ना आमच्या बायका.  घर विक्रीची बातमी पेपरमध्ये दिली. बरेचजण घर घ्यायला ऊत्सूक होते. त्यातल्या एकाशी सौदा ठरला. मी सहज म्हणून त्यांना विचारलं, "हे घर तुम्हांला का आवडलं?" त्यावर ते म्हणाले, " माझी तीन मुलं आहेत. ते नेहमी एकत्र राहावेत. म्हणून मला तीन मजली घर हवंय...' ●●●●● ३ -- खूप चालायला लागयचं तेव्हा रडायला व्हायचं. ...

कविता सावरकरांची! - हेमंत सांबरे

Image
कविता सावरकरांची !  -हेमंत सांबरे  राजा बढे हे स्वातंत्र्यपूर्व व नंतरच्या काळातील एक आघाडीचे कवी व गीतकार होते . पण त्यांचे एक विशेष म्हणजे ते सावरकरांचे निस्सीम भक्त होते. त्यांनी त्यांच्या एका कवितेत सावरकरांचे गुणगौरव गाताना म्हटले आहे , '"मराठ्यांच्या मूर्त स्फूर्ती विकासा  नवोउन्मेषशाली *कवींच्या कवे*, महासाहसी त्यागवीरा उदारा  किती आळवावे  तुला गौरवे ! " म्हणजे सावरकर हे *कवींच्या कवे* आहेत .  तुम्ही आम्ही सगळे लिहतो , वाचतो ,रोजच्या जगात वावरतो , काहीतरी करत राहतो , पण संकट आले की आपण सैरभैर असे होतो की नाही ? अशा संकटात आपले मन उद्विग्न होऊन आपल्या मूळ आवडीनिवडी, ध्येय इ  पासून दूर जाते व दुःखीकष्टी, व्यथित होते की नाही ? सावरकरांचे मग काय झाले असेल  ? इतक्या कठोर अंदमान सारख्या बंदिवासात ही त्यांची कविता फुलून आली , बहरून आली , तरारून तिला धुमारे फुटले ! म्हणूनच सावरकरांची कविता ही त्यांच्या ' पारतंत्र्यातून  मुक्त होऊ पाहणाऱ्या ' वृत्ती'  सारखी स्वतंत्र होती , म्हणूनच ब्रिटिशांनी त्यांच्या शरीराला जरी जखडून टाकले...

सावरकरांना " स्वातंत्र्यवीर" का म्हणावे ? - हेमंत सांबरे

Image
सावरकरांना " स्वातंत्र्यवीर" का म्हणावे ? -हेमंत सांबरे  नुसते 'सावरकर ' असे म्हणण्याऐवजी " स्वातंत्र्यवीर सावरकर " असे पूर्ण म्हंटले की एक तेजस्वी शब्द  आपल्या मुखातून बाहेर पडत आहेत  असे  भासते , व सावरकरांचा संपूर्ण जीवनपट आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो . कारण स्वातंत्र्य व सावरकर हे अभिन्न आहेत , हे दोन वेगळे शब्द भासत असले तरी! जसं आपण सर्वसामान्य मनुष्य श्वास घेतो , तसाच आपल्या भारतमातेला 'ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त करणे  हाच केवळ  सावरकरांचा श्वास व आयुष्यभराचा ध्यास होता. वीर सावरकर यांना पहिल्यांदा " स्वातंत्र्यवीर सावरकर " असे लिखित स्वरूपात ' स्वातंत्र्य' च्या अंकात म्हटले गेले . हा अंक ४-९-१९२४ चा अंक होता . यात चिटणीस प्रभाकर यांचा ' स्वातंत्र्यवीर सावरकर कुंडली विचार' या नावाचा लेख प्रसिद्ध झाला आहे . ह्या ज्योतिषाने हे भविष्य वर्तविताना सावरकरांना ' स्वातंत्र्यवीर' म्हटले आहे . या ज्योतिषाने सांगितलेली भविष्ये  खरी झाली नाहीत ,  पण पुढे जाऊन ' स्वातंत्र्यवीर' हा शब्द मात्र कायमचा...