Posts

Showing posts from August, 2021

जहाज कधी सोडू नकोस !

Image
'जहाज कधी सोडू नकोस !' वाटेवरती केव्हातरी गोष्टी चुकत जाणारच,  दम घोटणारी , न संपणारी  चढण चटके देणारच . निर्वाहाचे सारे निधी, तळापर्यंत पोचलेले  आणि कर्जाचे टोकदार ढिगारे आकाशाला भिडलेले  ओठांवरती  हसण्याभोवती  सुस्काऱ्यांचा जालीम फास काळजीपूर्वक चालतानाही पायाखाली काट्यांची रास , थकला असशील...  बैस जरासा , जोड श्वासाला श्वास  रण सोडण्याचा विचार नको दिसलं जरी सारंच भकास  आयुष्याची विचित्रवीणा किती वळणे किती पीळ, या शिकण्याच्या धुळाक्षरांना, पडत नसते खीळ  पकड सैल होताक्षणी , दोरखंडाचा साप होतो  डोंगरकड्याचा थांग तेव्हा केसभर दूर असतो आवेग हरवला गतीचा तरी गळ्यातल्या सुराला  देशील दाद एकाच बुक्कीच्या मुक्कामावर यशच उभे देईल दाद  माणसाची दृष्टीच कधी  इतकी अधू आणि धूसर बनते  इप्सित शेजारी उभे तरी , अनोळखीपणे पुढे निघते  विजेत्याच्या चषकावर मग, उमटत नाही यशोखुणा , अर्धवट सोडलेल्या झुंजीच्या  आठवणी कडू, उगारती फणा  सुवर्ण मुकुटावर उगवतीच्या दवात भिजली रात्र सरते हरलेल्या वाटेच्या , हताश हाती ...

रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले?

Image
*रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळालें ?*  -हेमंत सांबरे .                  आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून या १५ ऑगस्ट २०२१ ला ७५ वर्षे पुर्ण होत आहेत ...हा दिवस पूर्ण भारतात अतिशय उत्साह व आनंदाने साजरा होत आहे . पण त्याचवेळी ज्या थोर क्रांतिकारकांनी आपल्या देशासाठी सशस्त्र क्रांतीचा मार्ग अवलंबून आपल्या देशाला ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त केले , त्यांच्या बद्दल आपणास किती माहिती असते ? किंबहुना आजतागायत ही माहिती आपणापासून दडवून ठेवण्याचाच प्रयत्न झाला का ?  ज्या देशातला खरा इतिहास लपविला जातो व खऱ्या पराक्रमी लोकांची माहिती जर नव्या पिढीला माहीत करून दिले नाही तर त्या देशातले पौरुष व पराक्रम  संपून तो देश परत पारतंत्र्यात जाण्याची शक्यता निर्माण होते . डॉ बाबासाहेब आंबेडकर ही एके ठिकाणी म्हणतात की ,'जो देश इतिहासाचा अभ्यास करत नाही , त्यापासून काही शिकत नाही तो देश रसातळाला जातो ',  म्हणूनच वाचकहो आज आपण काही भारतीय क्रांतिकारक मंडळींच्या माहीत नसलेल्या गोष्टी जाणून घेणार आहोत .  हे क्रांतिकारक म्हणजे ...

धनंजय माने इथेच राहतात का ??

Image
या जगात आपल्याला रडवणारे लोक तर आपल्या आजूबाजूला खूप भेटतात पण खूप कमी लोक आपल्याला  हसवतात,काही क्षण दुःख, यातना विसरायला लावतात,त्यापैकी एका महान कलाकाराबद्दल  आज मी या लेखातुन माझ्या भावना तुम्हांसमोर मांडणार आहे. अशोक सराफ हे नाव घेतले की प्रथम , नकळत आपल्या चेहऱ्यावर एक मिश्किल हास्य उमटू लागते , नंतर आपल्या मनात काही सुखद आठवणी जाग्या  होऊन आपल्याला  मनातल्या मनात  गुदगुल्या व्हायला लागतात .कारण नुसता अशोक सराफचा चेहरा जरी समोर आला तरी त्याच्या चित्रपटातील विनोद आठवायला सुरुवात होतात , हा अनुभव तुम्हालाही आलाय ना ? 😊 म्हणूनच अ-शोक म्हणजे ज्याला बघूनच सारा शोक (दुःख ) पळून जाईल व ज्याच्या फक्त आडनावातच सराफ असले म्हणून काय झाले ?   हास्यरसाचे सोने रसिकांना भरभरून वाटले तो  तुमचा आमचा लाडका  हा *अशोक सराफ* ! दुसऱ्याला प्रचंड व लोटपोट हसविणारा हा मात्र स्वतः गंभीर दिसायचा ....बहुधा सर्वश्रेष्ठ विनोद निर्माण करताना गंभीरपणे  राहावे लागत असेल का 🤔 . अशोकच एके ठिकाणी म्हणतो की , " आपले काम करताना आपण खूप प्रामाण...