अभिनव भारत मंदिर - नाशिक- क्रांतितीर्थ

अभिनव भारत मंदिर -एक दुर्लक्षित क्रांतीतीर्थ - हेमंत सांबरे आपल्या देशांत इतिहासाचे बरेच वाचन होत असले तरी ज्या ठिकाणी हा इतिहास घडला त्या ठिकाणाकडे कायमच अक्षम्य दुर्लक्ष होत असते . कारण इतिहास जेथे घडला त्या ठिकाणची रचना शक्यतो जशीच्या तशी जपून ठेवणे , ही त्या इतिहासाला वा तेथल्या स्मृतींना जपण्यासाठी खूप आवश्यक असते . अशी किती ठिकाणे असावीत जेथे ऐतिहासिक पुरुष स्वतः वावरले , त्यांनी अनेकांना प्रेरणा दिली ती ठिकाणे जपली तर त्या इतिहासाची , त्या प्रेरणेची आठवण ही तितकीच ठळक राहते . नाशिक ही तर सावरकरांची सुरुवातीची कर्मभूमी ! येथेच त्यांच्या क्रांतिकारी विचारांचे बीजे पडली , व ती पुढे जगभर फोफावली . हे मी त्याआधी त्यांनीच लिहलेल्या पूर्वपीठिका व माझ्या आठवणी व इतर पुस्तके यातून खूप वेळा वाचलेही होते . पण प्रत्यक्षात या ठिकाणी जाणे हा एक अदभुत व रोमांचकारी अनुभव असतो ( अशीच भावना माझी रायगडाला भेट दिली तेव्हाही झाली होती ! ) . १८९९ साली सावरकर मध्य नाशकात ' तीळभांडेश्वर बोळ " नावाच्या गल्लीत राहायला होते असे मी खूप वेळ...