भारत काल , आज , उद्या -भारतीय स्वातंत्र्य अमृतमहोत्सवी वर्ष

भारत @७५ -हेमंत सांबरे खरे तर या विषयाचा आवाका खूप मोठा आहे , पण तरीही नियमाला बांधील राहून हा विषय मांडण्याचा प्रयत्न करतो . भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळाले , हे स्वातंत्र्य हे इतके काही सहज वा सोप्पे नाहीच मिळाले .फाळणीच्या रूपाने दोन शत्रूराष्ट्रे एकमेकांच्या समोर उभी ठाकली .त्यामुळे " स्वातंत्र्य " हे ब्रिटिशांच्या वा मुघलांच्या पारतंत्र्यापेक्षा सुखकर आहे अशी भावना असली तरी ती भावना सर्वांसाठी नव्हती हे दुर्दैवाने नमूद करणे प्राप्त आहे . कोणत्याही राष्ट्राला समर्थपणे उभे राहण्यासाठी शस्रे आणि शास्र या दोन्हींची आवश्यकता असतेच असते .या पातळीवर सुभाषचंद्र बोस व स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे खूप खूप आभार मानणे क्रमप्राप्तच आहे .कारण या दोघांनी स्वातंत्र्यपूर्व काळात अतिशय दूरदृष्टीने सैनिकीकरन केले व त्याचाच फायदा स्वतंत्र भारतालाही पाकिस्तान व चीन सारख्या शत्रूबरोबर लढताना झाला . स्वतंत्र भारताचे गेल्या ७५ वर्षांचे माझे वाचन व अनुभव याप्रमाणे तीन टप्पे करता येतील , १ .१९४७ ते आणिबाणी पर्यन्त चा भारत २ .आणीबाणी ते अगदी अलीकडे २०१४ पर्यंत चा भारत...