Posts

Showing posts from January, 2022

भारत काल , आज , उद्या -भारतीय स्वातंत्र्य अमृतमहोत्सवी वर्ष

Image
भारत @७५ -हेमंत सांबरे  खरे तर या विषयाचा आवाका खूप मोठा आहे , पण तरीही नियमाला बांधील राहून हा विषय मांडण्याचा प्रयत्न करतो . भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळाले , हे स्वातंत्र्य हे इतके काही सहज वा सोप्पे नाहीच मिळाले .फाळणीच्या रूपाने दोन शत्रूराष्ट्रे एकमेकांच्या समोर उभी ठाकली .त्यामुळे " स्वातंत्र्य " हे ब्रिटिशांच्या वा मुघलांच्या पारतंत्र्यापेक्षा सुखकर आहे अशी भावना असली तरी ती भावना सर्वांसाठी नव्हती हे दुर्दैवाने नमूद करणे प्राप्त आहे .  कोणत्याही राष्ट्राला समर्थपणे उभे राहण्यासाठी शस्रे आणि शास्र या दोन्हींची आवश्यकता असतेच असते .या पातळीवर सुभाषचंद्र बोस व स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे खूप खूप आभार मानणे क्रमप्राप्तच आहे .कारण या दोघांनी स्वातंत्र्यपूर्व काळात अतिशय दूरदृष्टीने सैनिकीकरन केले व त्याचाच फायदा स्वतंत्र भारतालाही पाकिस्तान व चीन सारख्या  शत्रूबरोबर लढताना झाला . स्वतंत्र भारताचे गेल्या ७५ वर्षांचे माझे वाचन व अनुभव याप्रमाणे तीन टप्पे करता येतील , १ .१९४७ ते आणिबाणी पर्यन्त चा भारत  २ .आणीबाणी ते अगदी अलीकडे २०१४ पर्यंत चा भारत...

हिंदूंनो , 'शिवचरित्र 'असे वाचा !! - हेमंत सांबरे

Image
हिंदूंनो , ' शिवचरित्र असे वाचा!! -हेमंत सांबरे  अलीकडे अशा बऱ्याच गोष्टी खोट्या स्वरूपात मांडण्याची सुरुवात झाली आहे  , मग या खोट्या गोष्टींना उचलून धरून त्यांना प्रसारित करण्याचे पद्धतशीर काम सुरू केले जाते , अशावेळी ज्यांचे योग्य वाचन नाही वा अभ्यास नाही असे नव-वाचक संभ्रमित होतात ...या सगळ्याला छेद द्यावा यासाठी हा लेख !  छत्रपती शिवराय हे आज नुसत्या महाराष्ट्राचे नव्हे , नुसत्या भारताचे नव्हे तर अवघ्या विश्वाचे आदर्श आहेत यात काय संशय ?  पण जेव्हा याच शिवरायांचें चरित्र नेमके कसे वाचावे ?  त्याकडे बघताना कसे बघावे , हे आज सांगून टाकणे अत्यंत गरजेचे झाले आहे . हा अभ्यास करताना व त्याकडे तटस्थपणे बघताना चार प्रकारचे कालखंडात त्यास विभागणी करावी लागेल . १ . *शिवरायांच्या जन्मापूर्वीचा महाराष्ट्र व भारत*  हा काळ म्हणजे प्रचंड धामधुमीचा व हिंदूंसाठी (जे इथले मूळ रहिवासी ! ) पारतंत्र्यात राहण्याचा होता ...साधारणपणे १५६५ च्या दरम्यान  विजयनगरचे हिंदू साम्राज्य पाच मुस्लिम शाह्यानी एकत्र येऊन नष्ट केले ..यात सगळ्यात मुख्य मुद्दा असा  होता की ...

सावरकरांचा स्रियांविषयी दृष्टीकोन व विचार !

Image
सावरकरांचा स्रियांबद्दलचा दृष्टिकोन ! हे वर्ष १९२४  आजपासून बरोबर ९८ वर्षांपूर्वी ! सावरकर नाशिक येथे आले असताना त्यांच्या एका स्रियांच्या सभेतील भाषण खाली मी जोडले आहे .  त्यावेळी मांडलेले क्रांतिकारक विचार वाचा  १ .स्रियांसाठी अशक्तपणा नव्हे तर सशक्तपणा हेच सौंदर्य  २. झाशीच्या राणीचा पराक्रम , सीतेचा त्याग हे आपले आदर्श असावेत ३ .मुलगा हवा , मुलगी नको ही मानसिकता चुकीची ! (आजही अशीच स्थिती आहे ) मातांनी मुलीचे हे पालन व्यवस्थित करावे असे सावरकर मांडतात ( सावरकरांनी आपल्या मृत्युपत्रात स्वतःच्या मुलीला ही संपत्तीचा समान भाग दिला - तेव्हा कायदा तसा नव्हताही ! )  ४ . आजकाल मुलीच्या विवाहाचे वय २१ व्हावे असा कायदा येत आहे किंवा आला आहे .. सावरकर तेव्हा सांगतात " योग्य वय येईपर्यंत मुलीचा विवाह करू नये " . ५ . शारीरिक शक्तीप्रमाणे मुलींना बौद्धिक व शालेय शिक्षण ही दिले पाहिजे . तर असे होते वीर सावरकर ! जशी उक्ती तशीच कृती ! शिवाय प्रत्येक गोष्टीत दूरदृष्टी तरी किती व प्रत्येक समस्येचा इतका सूक्ष्म अभ्यास !  आजही आपल्यातील क...

औषधे टाळू शकणारी औषधे !

*औषध नेहमी बाटल्या, गोळ्या किंवा लसींमध्ये सापडत नाही.....*  लंघन हे औषध आहे.  जंक फूड सोडणे हे औषध आहे.  व्यायाम हे औषध आहे.  उपवास हे औषध आहे.  निसर्ग हे औषध आहे.  हसणे हे औषध आहे.  भाज्या आणि फळे औषधी आहेत.  झोप हे औषध आहे.  सूर्यप्रकाश हे औषध आहे.  कृतज्ञता आणि प्रेम हे औषध आहे.  मित्र म्हणजे औषध.  ध्यान व नामस्मरण  हे औषध आहे.  निर्भय असणे हे औषध आहे.  सकारात्मक वृत्ती हे औषध आहे. सत्य बोलता येणे हे औषध , कारण मग खोट्याचे ओझे राहत नाही .   *सध्याचा क्षण स्वीकारणे आणि समाधानी राहणे हेच सर्वोत्तम औषध आहे* दुसऱ्याला माफ करणे हे औषध आहे . राग व द्वेषाचा त्याग करणे हे ही औषध आहे . आपल्याला जे आवडते ते करणे , आपला छंद जोपासणे हे औषध आहे . व हे दुसऱ्याला पुढे पाठवणे हे ही औषध आहे ..

#औरंगजेबाच्या वधाचा गुप्त कट !

#औरंगजेबाच्या वधाचा गुप्त कट !  #छत्रपती शिवाजी महाराज #स्वातंत्र्यवीर सावरकर  सध्या वाचत असलेल्या बाळाराव सावरकर लिखित " रत्नागिरी पर्व " या पुस्तकात हा उल्लेख सापडला . स्वातंत्र्यवीर सावरकर रत्नागिरीत असताना त्यांनी " दिल्लीचा डाव " या नावाने  एक भाषण दिले होते ..त्यात सांगतात की शिवाजी महाराजांचा आग्र्याला जाण्याचा उद्देश फक्त मिर्झाराजे जयसिंग यांच्या अटी पालन हाच नसून त्या ही पुढे असा काही होता . म्हणजे जसा त्यांनी अफजलखान मारला तशाच प्रकारे भर दरबारात वा एकांतात  संधी मिळताच औरंगजेबावर अचानक हल्ला करून त्याचा जागीच वध करून दिल्लीचे  तख्त ताब्यात घेणे असा शिवाजी महाराजांचा गुप्त कट होता .  अर्थात इतिहासात अशा प्रकारे तख्त पालट झालेही आहेत , स्वतः औरंगजेब ही अशाच प्रकारे स्वतःच्या बापाला तुरुंगात टाकून व भावाला ठार मारून दिल्लीच्या सिंहासनावर आरूढ झाला होता . शत्रूला अचानक बेसावध बघून ठार मारणे , ताब्यात सापडल्यावर जिवंत न सोडणे इ गोष्टीत शिवराय व मराठे  ही तरबेज होतेच , म्हणूनच ते औरंगजेबच्या तोडीस तोड असे शत्रू होते . युद्धात फक्त हुतात्मा होणे ह...