Posts

Showing posts from February, 2022

आझाद शेर!- ( चंद्रशेखर आझाद ).

Image
आझाद शेर !  आझाद शेर !  चंद्रशेखर आझाद यांचा जन्म २३ जुलै १९०६ या दिवशी उत्तरप्रदेश मधील भावरा नावाच्या गावात झाला होता .त्यांचे पूर्ण नाव चंद्रशेखर सीताराम  तिवारी ! आझाद ( हे नाव त्यांना नंतर मिळाले ) लहानपणापासून ते धाडसी वृत्तीचे व निर्भीड होते .  पुढे ते संस्कृत शिकण्याच्या हेतूने काशी येथे गेले . एक दिवस पाठशाळेतून येताना काही गुंड मुले , मुलींची छेड काढत होते .तेव्हा व्यायामाने शरीर कमावलेल्या बलदंड चंद्रशेखर ने सर्व गुंडांना चोपून काढले . असे होते पराक्रमी कुमार चंद्रशेखर !  लहानपणापासून स्वतंत्र वृत्तीचे असलेले चंद्रशेखर साहजिकच स्वातंत्र्याच्या चळवळीत ओढले गेले .तेव्हा गांधीजींनी असहकार चळवळ जोमाने सुरू केली . तेव्हा कॉग्रेस च्या घोषणपत्रिका चिकटविण्याचे काम १५ वर्षाच्या कुमार चंद्रशेखर ने केले .  तेव्हा घडलेला हा प्रसंग खूप प्रेरणादायी होता ..या आंदोलनात कुमार चंद्रशेखर ला एका मिरवणुकीत भाग घेतल्याबद्दल पकडले गेले व तेव्हा जो अधिकारी होता त्याचे नाव होते , ' खारेघाट'  त्याने सुनावणी च्या वेळी विचारले , " तुझे नाव काय ? ' तेव्हा च...

वासुदेव बळवंत फडके- एक झंझावात!

Image
भारताच्या मुख्य भूमिपासून शेकडो मैल दूर ,  दूर अगदी जिथे कुणाला ही कळणार नाही , अशा अज्ञात  ठिकाणी आजच्याच दिवशी एका देहाला अखेरची घरघर लागली होती , शरीर तळमळत होते व तेजस्वी डोळे मिटू लागले होते .... अखेर या दूर देशीच्या भयंकर कारागृहात या *महान आत्म्याने* ते शरीर सोडलेच एकदाचे ---पण हा आत्मा लौकिक अर्थाने _अनंतात_ वगैरे विलीन होणार नव्हता ----कारण या आत्म्याने भयंकर प्रतिज्ञा केली होती---" मी मरून जाईन , पण या दुष्ट , चांडाळ , प्रजाभक्षक इंग्रजांना मेल्यानंतर ही शांतता लाभू देणार नाही " -----आणि तेच खरे झाले --मग पुढे लगेच त्याच वर्षीच्या २८ मे ला या आत्म्याने शरीर धारण केले _विनायक_  _दामोदर सावरकर_ याचे---- ----आता तो आत्मा अगदी मुक्त झाला होता व त्याला कुठलेही बंधन उरले नव्हतेच ...मग त्याने अनेक शरीरे धारण केली ... मग तो थांबला कधीच नाही ---कधी ते मदनलाल धिंग्राचे , कधी अनंत कान्हेरे , कधी भगतसिंग , कधी राजगुरू , व पुढे मग तो आत्मा या दुष्ट इंग्रजांना या  देशातून घालवूनच शांत झाला ----  तो या महान आत्म्याच्या मुक्तीचा दिवस होता - *१७ फेब्रुवारी*...

#सावरकर आणि मंगेशकर

Image
#सावरकर आणि मंगेशकर  लता मंगेशकर यांचे वडील श्री दिनानाथ मंगेशकर स्वातंत्र्यवीर सावरकर यांना नेहमी भेटत असत .सावरकर रत्नागिरी येथे स्थानबद्ध असताना त्यांच्या नाट्य प्रयोगांच्या निमित्ताने त्यांच्या भेटी होत असत . वीर सावरकरांनी ' संन्यस्त खड्ग ' नावाचे नाटक श्री दिनानाथ मंगेशकर यांच्या " बलवंत संगीत मंडळी " साठी लिहले होते व ज्याचा पहिला प्रयोग मुंबई येथे १८ सप्टेंबर १९३१ रोजी झाला होता ..लतादीदी तेव्हा फक्त दोन वर्षांच्या होत्या . (संन्यस्त खड्ग -पहिला प्रयोग)  पुढे दिनानाथ जेव्हा रत्नागिरीला येत , तेव्हाही ते सावरकरांची भेट घेत ..एकदा तर दिनानाथ , लतादीदी व सावरकर एका हरिजन वस्तीमध्ये सहभोजनास एकत्र गेले होते , म्हणजे हे संस्कार मंगेशकर कुटुंबियांवर अगदी पहिल्यापासून होते असे दिसते . पुढे सावरकर रत्नागिरीहून मुंबईस " सावरकर सदन " येथे राहावयास आले . मंगेशकर कुटुंबीय ही कालांतराने मुंबई येथेच स्थायिक झाले .तेव्हाही लतादीदी व त्यांची भावंड वारंवार सावरकरांच्या घरी जात असत .वीर सावरकरांना माई (लतादीदी यांची आई ) च्या हातची ...

सावरकरांचे नातू श्री सात्यकी सावरकर यांच्यासोबतची हृदयस्पर्शी भेट व चर्चा !

Image
सुरुवातीपासून सांगतो . माझ्याकडे सात्यकी जी यांचा मोबाईल नंबर सहा महिन्यांपासून होता व ते ही माझ्यासारखेच सिंहगड रोडला राहतात हे ही माहीत होते , त्यामुळे भेटण्याची इच्छा खूप होती .पण मधल्या काळात सारख्या lockdown मुळे शक्य होतं नव्हते . दोन दिवसांपूर्वी त्यांना फोन केला , मनावर दडपण होते , पण बोलताना भेटण्याची इच्छा व्यक्त केली ....मनात साहजिक विचार होता की त्यांना वेळ असेल का इ पण आमच्यातील संवाद पहा, मी - "सात्यकी जी आपणास भेटायचे आहे "  सात्यकीजी- "मी साधारण सहा वाजता घरी येतो , तुम्हाला कधी वेळ आहे ,त्याप्रमाणे या ." हे उत्तर एकूण मी जागीच उडालो , म्हणजे मी वेळ विचारायचा तर त्यांनीच उलट माझा वेळ व सोय बघितली . तर अशा प्रकारे कालच त्यांच्या घरी जाऊन भेटलो . तब्बल सव्वा तास त्यांच्याबरोबर होतो . सात्यकीजी म्हणजे डॉ नारायणराव सावरकर यांचे नातू !  अशोकराव सावरकर यांचे चिरंजीव ! या वेळात आमची विविध विषयांवर चर्चा झाली . मग ते हिंदुत्व पासून तर सध्या कुठले पुस्तक वाचतो आहे तिथपर्यंत . घरी कुणी नसल्याने त्यांनीच उठून माझा व त्यांचा चहा बनवला . त्यांच्या चर्...