1946 -नाविक दलाचे बंड व अखेरचा स्वातंत्र्यसंग्राम !

मागच्या व दुसऱ्या भागात आपण आझाद हिंद सेनेने कशा प्रकारे बाहेरून ब्रिटिश भारतीय सत्तेवर आक्रमण केले , इथपर्यंत चर्चा केली . आता तिसऱ्या व शेवटच्या भागात आपण नाविक दलाचे 1946 चे बंड व इतर सशस्त्र दलांनी केलेला उठाव व त्याचे परिणाम यांची अतिशय खोलात जाऊन चर्चा करूया . पहिल्या भागात आपण बघितले की दुसऱ्या महायुद्धाच्या थोडे आधी व युद्ध सुरू असताना मोठ्या प्रमाणात ब्रिटिश भारतीय सैन्यात भरती झाली . भारतीय उपखंडाचा नकाशा आपण नीट बघितला तर लक्षात येईल की समुद्रकिनारा ( Sea Coastal ) (खाली चित्र जोडतोय ) हा भूभागाच्या सीमेपेक्षा तीन पटीने जास्त होता व आजही आहे . म्हणजेच जर ब्रिटिशांना जर आपल्या भारतातील साम्राज्याचे रक्षण करायचे असेल तर नाविक दल व त्यात त्यांच्यासाठी काम करणारे सैनिक खूप महत्त्वाची भूमिका (Role ) निभावत होते . म्हणजेच हे नौसैनिक कुणाच्या बाजूने आहेत ही गोष्ट खूप नाजूक (Critical ) ठरत होती . Royal Indian Navy ( ज्यांनी 1946 चा उठाव केला )ची स्थापना होण्यापूर्वी हे भारताचे समुद्रकिनारे Royal Navy च्या ताब्यात असत व Royal Navy ही सेना British Ne...