Posts

Showing posts from September, 2022

हेतू-कविता - श्री विलास कुलकर्णी

Image
div> हेतू कुणाची स्तुती करताच वटारतात ह्यांचे डोळे  हे असतातच निराळे घाटावरील डोमकावळे कुणाचे डोळे पुसल्यास ह्यांच्या पोटात दुखते आसवांनी भिजलो तरी त्यांना मगर रुदन वाटते कुणा मदत करताच ह्यांना स्वार्थ वाटतो संत ही आहेत जगी दावा फसवा नसतो सर्वच नसतात मेवेकरी थोडे वारकरी सेवेकरी जरी असुदे चांगला हेतू कुशंका ते घेतात तरी वटवृक्ष असतात कुणी विसाव्याला कुणी थांबते भरपूर प्राणवायू घेवून नवजीवन कुणा मिळते बाळगू नको किंतू विशुद्ध असता हेतू जन बोलतील काय चिंता नको करू तू  विलास कुलकर्णी मीरा रोड १७.६.२०१९

# अग्निवीर

Image
अग्निवीर  © हेमंत सांबरे  हा विषय अतिशय महत्वाचा असून यावर अतिशय खोलात जाऊन चर्चा व प्रत्यक्ष कृती होणे गरजेचे झाले आहे . तो म्हणजे आपले भारतीय  सैन्यदल अत्यंत प्रभावशाली करणे व पूर्वी कधीही नव्हते इतके ते सक्षम व बलाढ्य करणे .  फार पूर्वी आपल्या भारत देशावर मुघलांनी अतिशय मोठी व क्रूर आक्रमणे केली . देशाचा मोठा भूभाग दीर्घकाळ पारतंत्र्यात राहिला व तेथील जनतेला अतिशय दुःखाचे व कष्टाचे जीवन जगावे लागले . महाराष्ट्रात तर तब्बल साडे-तीनशे वर्षांच्या अंधकारानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने स्वातंत्र्यसूर्य उगवला . तेव्हा मराठ्यांनी अभूतपूर्व एकीचे दर्शन घडवत निदान काही भागाला तरी परकीयांच्या जोखडातून मुक्त केले . हिंदूंना परत भाग्याचे दिवस येऊ लागले . परत घराघरात दिवाळी-दसरा मोकळेपणाने साजरे होऊ लागले . तो काळ असा होता की जवळपास प्रत्येक मराठ्यांच्या घराघरांतून निदान एकतरी लढवय्या मराठा वीर शिवरायांच्या सैन्यात भरती असायचा , त्यामुळे प्रत्येक घर स्वराज्याच्या इच्छेने व स्वातंत्र्याच्या इच्छेने प्रेरित झालेले होते . कारण प्रदीर्घ काळ या सर्वांनी खूप खूप...

मोदी अभिष्टचिंतन - डॉ सचिन

Image
मोदी अभीष्टचिंतन  मानतो आम्ही हे अहोभाग्य दिव्य लाभले आम्हास मोदी  अलौकिक असे हा देशप्रधान बरळोत काही उगाच विरोधी संसदेसही त्यांनी मंदिर केले  लावून पायरीधूळ माथी  धर्मांध नाही पण धर्माभिमानी लोकतंत्र मानती मूळ मोदी एकनाथी होत सदैव सोशिक सोसती जहाल द्वेषक्लेश मोदी देशहितास्तव गोड मानून घेती कडू अपमान नी अपेश मोदी  अहोरात्र या पुण्ण्यभूमीस्तव  जागती नी कष्टती  मोदी  देशद्रोही ठाण्यांवर विध्वंसक अग्निबाण होत बरसती मोदी  इतिहासाची जाण नेमकी अन् वर्तमानाचे सत्य भान मोदी  छेद देती हरेक द्रोही षडयंत्रा दे जगी भारता सन्मान मोदी  विवेकानंदी स्थिरविवेक आणि शिवपेशवी यत्न  सशस्त्र मोदी तळमळ तीव्र ती सावरकरी नी कौटिलीय अर्थशास्त्र मोदी हा स्वयंसेवक हो प्रधानसेवक  नि:संग हो राजयोगी मोदी  उज्ज्वल देशभविष्य जहाजा जपती होऊन दक्ष समर्थ गोदी शिवतेजास बनवून आरसा  पथ पाहतील दावतील मोदी वर्तमानी स्थापित ते सर्वोच्च  पुनश्च सर्वोच्च शोभतील मोदी रचना- डॉ सचिन चिंगरे  धुळे  7499613912

#सांगता पर्व -बाळाराव सावरकर -पुस्तक परीक्षण

Image
#सांगता पर्व- बाळाराव सावरकर  (१९४७ ते १९६६) स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्यातील शेवटच्या वर्षांवर भाष्य करणारे पुस्तक  हे पुस्तक आज वाचून पूर्ण झाले . या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्यातील १९४७ ते मृत्यूपर्यंत चा काळ आचार्य बाळाराव सावरकर यांनी अतिशय हृदयस्पर्शी असा रेखाटला आहे .  ही वर्षे म्हणजे वीर सावरकरांच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाची वर्षे अशी म्हणता येतील . कारण सावरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ज्या भारतभूमी च्या स्वातंत्र्यासाठी आयुष्याचा होम केला, ते स्वातंत्र्य ' याची देही याची डोळा ' बघण्याचे भाग्य स्वातंत्र्यवीरांना  लाभले . याच काळात त्यांना गांधी खून खटल्यात विनाकारण गोवले गेले , व त्यातून ते पूर्णपणे निर्दोष मुक्त झाले . पुढे १९६० साली त्यांचा मृत्यूजय दिवस ही भारतीय जनतेने मोठ्या उत्साहात साजरा केला . याच काळात त्यांनी सहा सोनरी पाने या महत्वपूर्ण ग्रंथाचे लेखन पूर्ण केले .  याच काळात बाळाराव सावरकर हे वीर सावरकरांचें स्वीय सचिव होते व त्यांच्या प्रत्यक्ष सहवासात असल्याने त्यांनी या काळाचे अतिशय सुक्ष्म...