Posts

Showing posts from November, 2023

बधाई हो ! - हिंदी चित्रपट समीक्षा - हेमंत सांबरे

Image
बधाई हो ! सहज सुंदर अभिनय करण्यासाठी प्रसिद्ध झालेला आयुष्मान खुराणा माझा आवडता अभिनेता आहे . हटके चित्रपट करून ते हिट करणारा ही अभिनेता म्हणून तो प्रसिद्ध आहे . परवाच त्याचा " बधाई हो !" हा अप्रतिम सिनेमा दुसऱ्यांदा बघितला (आधी थेटर मध्ये बघितला होता आता OTT वर बघितला ) . यातला नकुल कौशिक (आयुष्मान ) बहुधा कुठल्यातरी IT कंपनी मध्ये नोकरी करत असतो . तिथेच त्याला त्याची प्रेयसी रीनी शर्मा भेटते . या चित्रपटाची कथा शंतनु श्रीवास्तव , ज्योती कपूर ,अक्षत घिडीयाल या तिघांनी मिळून लिहली असून  पटकथा संवाद - अक्षत घिडीयाल तर अमित शर्मा दिग्दर्शक आहे . एका सरळ रेषेत चालणाऱ्या कुटुंबाच्या घरात एक जगावेगळी घटना घडते व त्याने नकुलचे आयुष्य कसे u turn घेते यावर अतिशय अफलातून भाष्य करत ही कथा पुढे सरकत राहते . नकुलची आई (म्हणजे निना गुप्ता ) उतार वयात गरोदर राहते, त्यामुळे घडणाऱ्या गमती जमती सांगत , हलके फुलके विनोद करत , खुसखुशीत सवांदांची पेरणी करत हा चित्रपट आपले निखळ मनोरंजन करतो . ज्या आपल्या मुलाचे लग्न ठरवून आता त्यालाच मुल झाले पाहिजे (म्हणजे आपल्याला नातू झाला...

#गुरुजी नावाचा बाप - हेमंत सांबरे

Image
(एका निवांत क्षणी , उंब्री येथील आमच्या शेतात गुरूजीं सोबत )  #गुरुजी नावाचा बाप  - हेमंत सांबरे सध्याच्या काळात जिथे मुले आपल्या वडिलांना पप्पा , डॅडी इ म्हणतात पण आम्ही आमच्या बापाला गुरुजी म्हणून हाक मारत असायचो .. तेव्हा बरीच आजूबाजूची इतर माणसे , मोठे वयस्कर लोक ज्या नावाने हाक मारायचे तेच नाव बहुधा घरातही रूढ व्हायचे ... माझे वडील म्हणजे श्री सदाशिव बापूराव सांबरे हे प्राथमिक शिक्षक होते ...त्यामुळे अख्खा गाव त्यांना गुरुजी म्हणायचं मग आम्ही त्यांची मुलंही त्यांना ' गुरुजी ' असंच म्हणू लागलो ...विशेष म्हणजे आमच्या आईने ही त्यात आम्ही काही बदल करावा म्हणून काही प्रयत्न केले नाहीत (निदान मला तरी आठवत नाही ) . त्या काळात ह्या गुरुजी लोकांना तसा कमीच पगार असायचा (१९७० चां काळ) .. आमचे गुरुजींनी  (इथूनपुढे मी गुरुजी म्हणूनच उल्लेख करतो )तेव्हा संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथे  नोकरी सुरू केली होती . गुरुजी स्वतः दहावीला असताना इंग्लिश विषयात ३ वेळा फेल झाले होते व पण  पुढे त्यांनी डी एड पूर्ण केलें.  आमचे मूळ गाव उंबरी बाळापूर हे झरेकाठी पासून ...

केदारनाथ -१७ जून - डॉ प्रकाश कोयाडे - पुस्तक परीक्षण -

Image
#केदारनाथ १७ जुन  #लेखक - डॉ प्रकाश कोयाडे #परीक्षण  मराठी साहित्य विश्वात ज्यांची पहिली कादंबरी प्रतिपश्चंद्र आली व त्या कादंबरीने खळबळ माजवून दिली . २०१९ साली आलेल्या या कादंबरीची सध्या २३ वी आवृत्ती प्रकाशित झाली असून , OTT platform वर या पुस्तकावर आधारित एक web series ही येत आहे . त्यामुळे अर्थातच डॉ कोयाडे यांच्या दुसऱ्या पुस्तकाबद्दल नक्कीच उत्सुकता होती .  त्यांची दुसरी कादंबरी केदारनाथ १७ जुन ही नुकतीच प्रकाशित झाली . मी हे पुस्तक माझे मित्र श्री नवनाथ जगताप यांच्या  # पुस्तकविश्व या दुकानातून घेऊन कालच वाचून पूर्ण केले .  '१७ जुन २०१३ या दिवशी केदारनाथ ( उत्तराखंड ) याठिकाणी मंदाकिनी नदीच्या खोऱ्यात जो भयंकर असा महापूर आला होता व त्यामुळे जे भूस्खलन झाले ', हा विषय केंद्रस्थानी ठेवून ही कादंबरी लेखकाने लिहिली आहे .  जसे इतर कांदबरी विषयांत गूढ , रहस्य इ विषय घेऊन लिहले जाते तसा इथे " सुटकेचा थरार " असा प्रकार लेखकाने हाताळला आहे .  सिद्धार्थ नावाचा डॉक्टर व त्याचे कुटुंबीय या प्रलय संकटात सापडतात त्यानंतर तो खूप सारी संकटे सहन करून...

कोई जब तुम्हारा हृदय तोड दे.... हेमंत सांबरे

Image
( स्वर्गीय मुकेश )  कोई जब तुम्हारा हृदय तोड दे ...... - हेमंत सांबरे प्रियकर त्याच्या प्रेयसीच्या आकंठ प्रेमात बुडालेला आहे ...पण तिला त्याची जाणीव नाही , तिला त्याची अजिबात ही किंमत नाही ...ती त्याच्या पासून दूर दूर जात आहे , त्याला ते दिसत आहे की ,त्याचे निर्व्याज प्रेम तिला कळत नाही ..त्याचे प्रेम मात्र स्वार्थाच्या , स्वमग्नतेच्या पलीकडे केव्हाच जाऊन पोहोचले आहे ..ती दुसऱ्या कुणाच्या तरी प्रेमात पडत आहे , किंवा पडलीच आहे हे त्याला दिसत आहे ..ती आता परत येणार की नाही हे ही त्याला माहीत नाही ...तिच्या परत येण्याचे सगळेच रस्ते तिने बंद केले असेल तरी तो मात्र स्वतःचा दरवाजा केवळ तिच्यासाठी उघडुन बसला आहे ... ती जरी दुसऱ्या कुणाकडे गेली असली तरी याचे हृदय मात्र फक्त आणि फक्त तिच्यासाठी रिकामे आहे ... तो हे पक्के जाणतो की तिला आता आपली काहीही गरज नाही कारण ती खूप सुंदर आहे , तिच्यावर खूप जीव टाकणारे तिला मिळत आहेत ...पण तो तिला निक्षून सांगतो की हे सारे फक्त तिचे सौंदर्य , तिचे तारुण्य यालाच भुलून तिच्या जवळ आले आहेत ... पण , पण एक दिवस असा येईल की तिचे हे सौंदर्य , हे त...

मराठा समाजाला आरक्षण का हवे आहे?- हेमंत सांबरे

Image
*मराठा समाजाला आरक्षण का हवे आहे ?*  - हेमंत सांबरे मरहट्टा=मराठा  जो मरेगा लेकीन हटेगा नहीं!  *लढाई करताना एकवेळ हा मृत्यू पत्करेल , पण मागे हटणार मात्र नाही .*   अशी ज्याची ख्याती  सांगितली जाते तो म्हणजे *मराठा* ! पण शिवरायांच्या काळात व पुढे मराठ्यांनी जेव्हा ७५% भारत जिंकून जिकडे तिकडे आपली सत्ता स्थापन केली होती , तेव्हा उत्तरेकडे ' मराठा ' म्हणजे जो महाराष्ट्रातून उत्तरेत लढायला आला तो तो प्रत्येक सैनिक हा ' मराठा ' च समजला गेला . मग या सैनिकांत महाराष्ट्रातील सगळ्याच जातींचे सैनिक होते, त्यामुळे त्या अर्थाने लढाई करणारे सगळेच मराठा !  अलीकडच्या काळात महाराष्ट्रात अतिशय ज्वलंत बनलेला विषय म्हणजे , ' *मराठा आरक्षण* ' .  माझे अनेक मित्र याच समाजातील आहेत . शिवाय हे आंदोलन गेल्या अनेक वर्षांपासून अतिशय शांतपणे व शिस्तबध्द असे सुरू आहे . त्यामुळे माझ्या सारख्या कुंपणाच्या बाहेर असलेल्या व्यक्तीला खूपच उत्सुकता होती . म्हणून , मी सर्व मित्रांशी बोलायला सुरुवात केली , या विषयाच्या खोलात जाऊन मी अभ्यास करू लागलो .  इतर (मराठा नसले...