Posts

#छावा चित्रपट मनोगत

Image
आत्ताच छावा बघून बाहेर आलो आहे ...मन प्रचंड अस्वस्थ व क्षोभित झाले आहे ..  प्रथम श्री लक्ष्मण उतेकर यांच्या धाडसाचे मनापासून कौतुक .. त्यांनी निर्भयपणे सत्य दाखवले आहे .  पराक्रमी संभाजी राजेंचा इतिहास खरोखर पिढ्यान् पिढ्यानं प्रेरणादायी आहे . आपल्या भारतात हिंदू धर्म का टिकून राहिला याचे सर्वात मोठे श्रेय जर द्यायचे असेल तर ते  संभाजी महाराज यांच्या बलिदानाला जाते .  दिग्दर्शक उतेकर यांनी मध्ये मध्ये काही वाक्य पेरून सर्वधर्मसमभावाचा तडका दिला असला तरी , हा चित्रपट अंतिमतः योग्य तो परिणाम साधून जातो व झोपलेल्या हिंदूनी ( आता तरी ) जागे व्हावे असा संदेश नक्कीच देतो .  औरंगजेबाच्या हातात जे जे कुणी काफिर सापडले त्या त्या सगळ्यांचा त्याने अशाच प्रकारे छळ केला आहे . त्यामुळे संभाजी महाराज त्याच्या तावडीत दुसऱ्या वेळी ( पहिल्यांदा आग्र्यात ) सापडल्यावर तो त्यांना सोडणार नव्हताच ,  पण ज्या धीरोदात्त वृत्तीने राजे मरणाला सामोरे गेले ते बघून त्याला मारणारा हा क्रूरकर्मा औरंगजेब स्वतःही नक्कीच धास्तावला असावा .  शेवटची संगमेश्वर येथे झालेली लढाई हा...

पुस्तक परिक्षण ा#11 रुल्स फॉर लाईफ#chetanbhagat

Image
#पुस्तक परीक्षण #11 रुल्स फॉर लाईफ #chetanbhagat अलीकडेच  पुण्यात झालेल्या पुस्तक महोत्सवामध्ये हे पुस्तक मी विकत घेतले. चेतन भगत हा माझा अतिशय आवडता लेखक आहे त्यांची बहुतांश पुस्तके मी वाचून पूर्ण केलेले आहेत. चेतन भगत यांनी लिहिलेले इंग्लिश खूप सोपे असल्यामुळे सहसा मी त्यांची इंग्लिश पुस्तके वाचतो, परंतु या महोत्सवात मला इंग्लिश पुस्तक न मिळाल्याने,  मी मराठी पुस्तक विकत घेतले व ते वाचून पूर्ण केले. या पुस्तकातून चेतन भगत यांनी स्वतःच्या अनुभवावर आधारित 11 नियम तयार केले आहेत आणि ते आपल्या वाचकांबरोबर त्यांनी शेअर केले आहेत. कथेच्या माध्यमातून आपल्या पुस्तकाची मांडणी करणे ही भगत यांची पद्धत आहे. त्याच पद्धतीने त्यांनी हेही पुस्तक लिहिले आहे. त्यामुळे वाचताना अतिशय मनोरंजनात्मक वाटते आणि पुस्तक पूर्ण वाचून होईपर्यंत खाली ठेवावेसे वाटत नाही . आरोग्य सारख्या महत्त्वाच्या विषयावर सुरुवात करून त्यांनी अगदी गुंतवणूक हा अलीकडच्या काळात दुर्लक्षित राहणारा घटक तोही त्यांनी या नियमांमध्ये मांडला आहे.  त्यांची मांडण्याची पद्धत अतिशय सोपी असल्यामुळे पुस्तक बिलकुल ...

'कोई दिक्कत नही ' अर्थात आमची उत्तरप्रदेश यात्रा ! - हेमंत सांबरे

Image
कोई दिक्कत नही! ( अर्थात  आमची उत्तरप्रदेश यात्रा )  अर्थात आम्ही काही पूर्ण उत्तरप्रदेश फिरलो असे नाही . पण माझ्या व माझ्या कुटुंबाचे स्वप्न पूर्ण करणारा हा प्रवास होता .  मागच्या वर्षी आम्ही दक्षिणेत म्हणजे हंपी बदामी केले तर यावेळी उत्तर दिशा पकडुन आम्ही अयोध्या ( प्रभू श्रीराम जन्मभूमी  दर्शन ) , प्रयागराज , वाराणसी ची यात्रा पूर्ण केली .   आधीच्या एका पोस्टमध्ये मी आमच्या अयोध्या दर्शन बद्दल थोडेसे लिहले होते , पण आता यात्रा  पूर्ण झाल्यावर एकूणच उत्तर प्रदेश बद्दलचे आमचे अनुभव याबद्दल सविस्तर लिहावे असे वाटले म्हणून ही धडपड !  या प्रदेशांत दीर्घ काळ मुघलांनी राज्य केल्यामुळे इथे अजूनही अनेक मुसलमानी खुणा दिसतात . अनेक गावांची नावे अजूनही मुघली आहेत , ते बदलण्याचे काम ही योगी जी यांच्या नेतृत्वात सुरू आहे . याच राज्यात आग्रा शहर असून जेथे जगप्रसिद्ध ताजमहाल आहे , पण गेल्या वर्षभरातच ही ओळख (ताजमहालाची ) पुसली जाऊन याच राज्यात आता जगप्रसिद्ध असे भव्य दिव्य असे प्रभू श्रीरामांचे मंदिर उभे राहिले आहे . नुकत्याच आलेल्या ताज्या आकडेवार...

माझी जन्मठेप - आत्मकथा - वीर सावरकर - पुस्तक परीक्षण

Image
आत्ताच माझी जन्मठेप वाचून हातावेगळे केले.  हे पुस्तक वाचण्याची नक्की कितवी वेळ आहे , हे मलाही आठवत नाही . इतक्या वेळा वाचूनही यावर लिहण्याची तीव्र ऊर्मी मात्र यावेळी खूप अशी दाटून आली आहे .  हे पुस्तक वाचून मला समजले आहे , ज्या ज्या भावना माझ्या मनाला व्यापून राहिल्या आहेत त्या त्या(शक्यतो) सगळ्याच गोष्टी तुम्हाला ही कळाव्यात अशी माझी प्रामाणिक इच्छा झाली आहे .. मी या आत्मकथेचे शेवटचे पान आत्ता उलटत आहे . अनेक वेळा सुटकेचे वृत्त येऊनही याआधी  प्रत्यक्ष सुटका कधीही न मिळालेले सावरकर यावेळी मात्र खरेच आपली सुटका होणारच ,हे कळून खूप भावनिक झालेले आहेत . वाचक म्हणून आपल्याही मनात अनेक संमिश्र भावना दाटून येतात . या जन्मठेपेचे  शेवटचे वृत्त वाचताना माझेही डोळे पाण्याने भरून आले आहे . पण हे कदाचित आनंदाश्रू आहेत , कारण या माझ्या कथेच्या नायकाची सगळ्या यातना मधून सुटका होत आहे म्हणून येणारे ते डोळ्यांतील अश्रू आहेत . दुसऱ्या बाजूने या दिव्य पुस्तकाची इतिश्री झाल्याने , आपण आता या पुस्तकापासून दुरावणार  याचेही दुःख असेल का ? म्हणूनच  अश्रू येत आहेत का ...

तुम्ही ' सावरकर ' हा चित्रपट बघितला का ? - हेमंत सांबरे

Image
*तुम्ही ' सावरकर ' चित्रपट बघितला का ?*  © हेमंत सांबरे #सावरकर  # स्वातंत्र्यवीर सावरकर #रणदीप हुड्डा  काल संध्याकाळी अखेर हा सध्या बहुचर्चित असलेला चित्रपट बघितला .  " *सत्य हे नेहमी एकाकी प्रवास करत असते"* , असे एक सुप्रसिद्ध वाक्य आहे . सावरकरांचे जीवन म्हणजे या वाक्याचे यथार्थ दर्शन आपणास करून देते . पण इतका सारा एकाकी प्रवास करूनही , सत्याची कास न सोडता जगत राहणे हे अगदी एखाद्या सावरकरांनाच काय ते जमू शकते . मी खूप लहानपणी माझी जन्मठेप वाचले होते , त्यानंतर ही अनेक वेळा वाचले आहे , कारण हे पुस्तक म्हणजे माझ्या आयुष्याचे प्रेरणास्रोत आहे .  रणदीप हुड्डा अमराठी असूनही त्याने सावरकरांची भूमिका जगली आहे .  आपण चित्रपट बघत असताना समोर येणारी प्रत्येक फ्रेम , प्रत्येक प्रसंग खूप वेगाने आपल्या पुढून सरकत राहतात . तरीही प्रत्येक प्रसंग मनावर कोरला जातो , मग पुढे सरकतो . हे अगदी साहजिक आहे, कारण १८९७ ते १९५० इतका मोठा कालावधी तीन तासांत बसवणे ही कसरत आहे . तरीही हुड्डा ने अतिशय सयंत, ताकदीच्या अभिनयाने करून दाखवले आहे .  अनेक प्रसंग सांगण्यासा...

" वीर सावरकर "दशकांवरील धूळ झटकणारा चित्रपट

Image
अनेक दशकांवरील धूळ झटकणारा चित्रपट - ' स्वातंत्र्यवीर सावरकर ' एखादा विषय अत्यंत क्लिष्ट आहे  , त्यात अनेक वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश व त्यांचे वेगवेगळे घटक असतात तेव्हा तो विषय अगदी सहज हाताळला जात नाही. परिणामी त्यावर हळूहळू धूळ चढत जाते अन् तो विषय इतिहासजमा होतो की काय अशी शंका उपस्थित होते. पण वेळीच त्यावरील धूळ झटकली गेली तर तो विषय पुन्हा पुढे येतो. ' स्वातंत्र्यवीर सावरकर ' हा चित्रपट काहीसा असाच आहे. चित्रपट केवळ सावरकरांचा आहे हे म्हणणं काहीसं चुकीचं ठरेल कारण चापेकर बंधू , वासुदेव बळवंत फडके , लोकमान्य टिळक  , अनंत कान्हेरे याच चित्रपटातून संपूर्ण देशभरात बघितले जाणार आहेत. क्रांतिकारक हे भारतीय स्वातंत्र्याचे असे पान आहे जे थोडेसे गुंतागुंतीचे आहे पण त्यातून शिकण्यासारखे बरेच काही आहे. ते पान अतिशय व्यवस्थित रित्या उलगडून दिग्दर्शकाने आपल्या समोर ठेवले आहे. त्यावरील दशकांची धूळ आता बाजूला झाली आहे. जर तुम्ही केवळ एका व्यक्तिरेखेला बघण्यासाठी जात असाल तर तुम्हाला आश्चर्याचा हा सुखद धक्का बसू शकेल इतकं नक्की. चित्रपटाच्या जमेच्या बाजू म्हणाव तर पू...

वैष्णव - लेखक - वि वा शिरवाडकर - कादंबरी - पुस्तक परीक्षण - हेमंत सांबरे

Image
#पुस्तक नाव - वैष्णव  #लेखक - वि वा शिरवाडकर #प्रकार - कादंबरी 'दुर्मिळ पुस्तके' नावाचे फेसबुकवर एक पेज आहे ..  त्यांच्याकडून ही " वैष्णव " नावाची कुसुमाग्रज लिखित ही छोटेखानी कादंबरी मागवली होती .  पुस्तकाच्या मुखपृष्ठावर गांधींचे चित्र आहे .. आधी मला वाटले की खुद्द गांधींच्या आयुष्यावर आधारित हे पुस्तक असावे . पण वाचायला सुरुवात केली व विषय समजला . बरेच दिवस माझ्या पुस्तकांच्या कपाटात हे पुस्तक तसेच पडून होते , परवा सहज चाळायला सुरुवात केली तर ,त्यातल्या भाषेने मला इतकं खिळवून ठेवले की कादंबरी वाचूनच पूर्ण केली .  या कादंबरीचे वैशिष्ट्य असे की , फक्त आणि फक्त मराठी भाषेचा वापर ! ही मराठी देखील अगदी अभिजात .  कथेचा कालावधी आहे १९३५ ते १९४२ . त्यावेळी घडत असलेल्या घटनांची पार्श्वभूमी घेऊन , त्याभोवती काल्पनिक पात्रांची गुंफण लेखकाने केली आहे . विनायकराव नावाचे प्राथमिक शिक्षक या कादंबरीचे नायक आहेत . सुरुवातीला त्यांचा स्वभाव अतिशय भित्रा व बुळा असतो . कोणीही काहीही बोलले तरी गुपचूप मान खाली घालून ऐकून घेणे , काहीही उत्तर न देता सहन करणे असा त्यांचा ...