Posts

Showing posts from April, 2021

जर आंबेडकर जन्माला आले नसते तर!

Image
युगपुरूष डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏  *जर आंबेडकर जन्माला आले नसते तर !**  【 ◆ हा लेख म्हणजे माझे स्वतःचे प्रांजळपणे मांडलेले अनुभव कथन आहे ,  सोप्या शब्दांत मांडण्याचा प्रयत्न केला आहे , ज्यांना डॉ आंबेडकर या विषयाची आवड आहे त्यांनी नक्की वाचावा , आवडेल अशी आशा आहे ◆】  🖋️🖋️- हेमंत सांबरे  # *_प्रसंग पहिला_*  साधारण 1990 च्या दरम्यानचा काळ असेल .स्थळ - अहमदनगर जिल्ह्यातील एक खेडेगाव . या गावातील एका गल्लीत एक ब्राह्मण जातीचा  मुलगा व एक महार जातीचा मुलगा दोघांचेही वय आठ-नऊच्या मध्ये असते व या दोघांची खूप मैत्री होते .ही मैत्री अर्थात जी  लहानपणी असते ,  तशीच अगदी निस्वार्थी व जिवापाड मैत्री आहे .दोघेही एकमेकांच्या घरी जातात   , खातात , एकत्र खेळतात  वगैरे वगैरे ! या दोघांचे प्रेम इतके असते की बऱ्याच वेळा त्यांना एकमेकांना सोडून करमत नाही . अगदी एकाच ताटात जेवण करणे , बरोबर बसून अभ्यास करणे , बरोबर शाळेत जाणे व परत येणे , बरोबर खेळणे हे तर रोजचेच झाले ...हे करण्यात दोघांच्याही घरून कुठ...

*प्रतीक्षा* ( कविता )

*प्रतीक्षा*   मी उभा कधीचा इथे करीत तुझी प्रतीक्षा वाट बघणे सदैव तुझी हीच  का मम् भाळी शिक्षा    तुझी वाट पाहणे  होई वेदनादायी तुझ्याविना विचार दुसरा मनी नाही  ये तू सत्वरी आता संपवुनी ही परीक्षा || १ ||  तुझ्या सहवासाची लागली मज ओढ न येण्याचा हा तुझा ,  हट्ट आता प्रिये सोड आतुरले बघ मन माझे संपली आज तितीक्षा ||२ ||

आईला आठवताना!

आईला आठवताना  आईला आठवताना  खरे तर मला काहीच कळत नाही ... डोळ्यांत येणारे पाणी आठवणी रोखून धरू शकते का ?  की मग डोळ्यांतून येणाऱ्या पाण्यातून .. हळूहळू आठवणी गळू लागतात .. तसे तिची येणारी आठवण म्हणजे तिच्या जगातून अचानक निघून जाण्याचा सल की अजून काही ... आईला आठवताना  खरे तर मला काहीच कळत नाही .... रिकाम्या वेळी मन मला समजावू पाहते तिचे शारीरिक नसणे माझ्या आसपास... पण त्याचवेळी तिच्या आशीर्वादाचे हात फिरतात माझ्या केसांतून .. मग मी मनाला लागतो समजावू !  बाबा रे आई माझी अजून कुठे रे गेली ? तिचा वावर  आहेच की माझ्या जगण्यात ... तिच्या दुःखाचे काटे असायचे खूप  टोकदार ... पण तिने फक्त फुलेच दिली आम्हाला वाटून .... चांगलेच व्हावे प्रत्येकाचे ही तिची देवास कायमची प्रार्थना ... मनाची शुद्धता हाच होता तिचा खरा दागिना ... आईला आठवताना  खरे तर मला काहीच कळत नाही ... आईला आठवताना  खरे तर मला काहीच कळत नाही ... ०७/०५/२०२०

आईस माझ्या!

आईस माझ्या कुणी बोलू नका हो ! आईस माझ्या कुणी बोलू नका हो !  आईने माझ्या किती कष्ट साहिले  किती उन्हाळे , पावसाळे पाहिले  दिवस तिच्या सुखाचे आले हो सुखास तिच्या कुणी दृष्ट लावू नका हो!  किती प्रेमळ माझी माऊली  सर्वांच्या सुखदुःख ची सावली प्रेम देई सर्वास एकसारखे हो  प्रेमास तिच्या समजून घ्या हो!  आई माझी किती चांगली आई माझी किती चांगली  किती दुःखे तिने भोगली  तिच्या दुःखाचे पापुद्रे कुणी सोलू नका हो  !  आई जर  या जगी नसती  आई जर या जगी नसती तुम्हीच सांगा मजला मग कुणी या जगी , या दुःखाचा एव्हडा भार पेलला असता हो  !  दुसऱ्यांची दुःखें घेऊन स्वह्रदयी दुसऱ्यांस जी सदैव तत्पर हसवी तिचे दुःखे  तुम्हा का वाटे फसवी तुम्हीच सांगा दुसऱ्यांस , फसविण्या का मग  ती आई झाली का हो !

कवितेचा जन्म कसा होतो ?

मला काय वाटते सांगू ?  कविता येते आपल्या आतून जसा जन्म आईच्या गर्भातून फुल जसे उमलते कळीतून तशीच यावी ती सहजपणे  मला काय वाटते सांगू?...... नको उगा शब्दांची पळवापळवी नको उगा असह्य जुळवाजुळवी शब्द असे सहज यावे  अलगद उतरावे कागदावर मग त्यांनी बेशक राज्य करावे जन- जनांच्या ह्रदयांवर मला काय वाटते सांगू ?..... कवी नसावा  कुणाचा ताबेदार स्वतंत्र असावा त्याचा आविष्कार लिहावे फक्त तेच ते जे कवीच्या अंतरीचे  त्याच्या मनीचे आर्त  जे सहज अन उस्फुर्त मला काय वाटते सांगू ? ... १४.०४.२०२०. © हेमंत सांबरे

# सिनेमा गल्ली ' *आलाप* ' चित्रपट

# सिनेमा गल्ली  ' *आलाप* '  चित्रपट  आजच हृषीकेश मुखर्जी दिग्दर्शित ' आलाप' हा नितांतसुंदर चित्रपट बघितला ..खरे तर सध्या लॉक डाऊन च्या मुळे वेळ मिळत आहे ..या चित्रपटापर्यंत मी कसा  पोहोचलो ती पण एक वेगळीच ष्टोरी आहे  ..वेळ असल्याने मी माझ्या जुन्या डायऱ्या काढून बसलो होतो ..त्यात 2000 साली लिहलेल्या डायरीत मला या चित्रपटात असलेले " कोई गाता मैं सो जाता " हे पुर्ण गाणे लिहलेले मिळाले ...कदाचित हे गीत मला कविता म्हणून खूप आवडले होते म्हणूनच मी ते लिहून ठेवले असावे ...मग त्या जुन्या आठवणी जाग्या होताना मला या गाण्याची चाल ही आठवली  ...मग मी हे गाणे सारखे गुणगुणत राहिलो .... म्हणजेच या गाण्याने माझे  हृदय तेव्हाच जिंकले होते . म्हणूनच मधल्या काळात (२० वर्षांत ) हे गाणे कधीही न ऐकूनही त्याची चाल व पूर्ण गीत मला पाठ होते .  फक्त डायरीत दिसल्याने त्याला ट्रिगर मिळाला ... तीन दिवसापूर्वी हे गाणे मी you tube वर बघितले ...आणि नंतर कमीतकमी दहा वेळा बघितले ....आणि आज हा प्रवास मला हा चित्रपट amazon prime वर मिळाला  तेव्हा पूर्णत्वास गेला, अन मी तर खूपच ख...

*डॉ बाबासाहेब आंबेडकर - स्टार प्रवाह - मालिका*

*डॉ बाबासाहेब आंबेडकर - स्टार प्रवाह - मालिका*  सध्या आम्ही पूर्ण कुटुंबीय स्टार प्रवाह वर रोज रात्री ९ वाजता चालू असलेली डॉ बाबासाहेब आंबेडकर ही मालिका नियमित बघतो व माझा मुलगा अर्जुन सहित आम्ही सर्व डॉ बाबासाहेब या व्यक्तिमत्वाच्या *अक्षरशः* *प्रेमात* पडलो आहोत . खरे तर आजकाल आपण सर्वांचे वाचन तसे कमी झाले आहे , पण ही मालिका अतिशय योग्य वेळी आली आहे . काय जबरदस्त माणूस होते *बाबासाहेब* ! खऱ्या अर्थाने बाबासाहेब प्रचंड मोठे *देशभक्त* होते . या मालिकेमुळे त्यांचे अनेक पैलू पुढे येत आहेत , आणि आपण सारे फ़क्त त्यांना " *दलितांचे नेते "* व *संविधान* *निर्माते* एव्हढेच मानून वा केवळ  तशाच प्रकारे *प्रोजेक्ट* केल्यामुळे एका अतिशय *जबरदस्त* नेत्याच्या बाकीच्या गुणांकडे दुर्लक्ष करत आहोत असे मला मनापासून वाटतेय . खरेतर मी ही मालिका बघून डॉ आंबेडकर यांचे खालील गुण मला खूप महत्त्वाचे वाटतात ज्यातून संपूर्ण भारतीय समाजाने खूप शिकण्यासारखे आहे  १ . जबरदस्त *आत्मविश्वास*  २ . कुठलीही समस्या आली तरी *घाबरून* न जाता त्याला *तोंड* देण्याची वृत्ती  ३. ज्ञान प्राप्त करण्याची *प्र...

शिवाजी* *महाराज* यांचे अदभुत युद्ध धोरण

Image
शिवाजी* *महाराज*  यांचे अदभुत युद्ध धोरण नुकताच परत एकदा " पद्मावत " हा चित्रपट बघितला . या चित्रपटात दाखविले आहे की अल्लाउद्दीन खिलजी दोनदा निःशस्त्र राणा रतनसिंग च्या समोर येतो व दोन्ही वेळेस रतनसिंग त्याला ठार न मारता सोडून देतो त्याच वेळी रतनसिंग एकदाच निःशस्त्र च्या समोर येतो व अल्लाउद्दीन त्याला लगेच पकडून दिल्लीला घेऊन जातो .   *अवसान* *घातक* *व* *देशबुडवी* *सहिष्णुता*  दिल्ली तुन निघताना रतनसिंग मोठ्या आवेशाने म्हणतो की राजपूत निशस्त्र शत्रूवर वार करत नाही , आणी शेवटच्या प्रसंगी मलिक कफूर मात्र रतनसिंग च्या पाठीवर वार करून त्याला ठार मारतो .              *काय* *गमावले* ? रतनसिंग च्या या  अवसान घातक सहिष्णू गुणामुळे त्याने पूर्ण मेवाड चे राज्य हाल हाल होऊन मरण्यासाठी अल्लाउद्दीन व त्याच्या फौजेच्या हवाली केले .हजारो राजपूत स्रिया जोहर करून आगीच्या हवाली झाल्या .  कल्पना करा पहिल्याच वेळी हा अल्लाउद्दीन राजपुतांच्या ताब्यात मिळाल्यावर त्याला ठार केले असते तर ?  नाही पहिल्या वेळी तर  निदान दिल्ली...

वटवृक्ष

आज सकाळी फिरायला बाहेर पडल्यावर समोर एक विशाल वटवृक्ष आला आणि त्यास पाहून स्फुरलेल्या ओळी ..... तो पहा विशाल वटवृक्ष  उभा समोर जणू की पुराणातील महान  ऋषि जसा  तटस्थ , ध्यानस्थ ,  आत्ममग्न  व्रतस्थ , भासे मम् तो  असा किती शतकांचा  घोर तपस्वी  वटपारंब्या कशा लोळती  तव तनुभोवती जटांचे केशसंभार ते किती  पुरातन भासती  शांत , चिरंतन , शाश्वत  तरी तू भासतो  किती कठोर  वाटे मज  भक्कम आधार ,   जरी न जाणो  किती शतकांचा तू  मूक साक्षीदार ०९.०२.२०२०.

स्वच्छतेचा हा एकच नारा ( कविता )

स्वच्छतेचा हा एकच नारा  स्वच्छ करूया भारत सारा||धृ|| मतभेद सारे विसरुया जातीभेद सारे विसरूया नव्या दमाचा नवउन्मेशी  नवभारताचा नवा वाहतो वारा ||१|| चला घेऊया एकच शपथ रस्त्यावर मी थुंकणार नाही कचरा ही फेकणार नाही अंगी आमच्या आज संचारला, नवनिर्मिती चा नवाच वारा ||२|| नवा भारत श्रेष्ठ भारत  स्वच्छ भारत सुंदर भारत तुम्हा आम्हा सर्वांचा हाच एक नभी घुमला तो  मंत्र खरा ||३|| जसे आपले घर सुंदर असते तसाच भारत स्वच्छ-सुंदर करूया आता न मागे वळून बघणे आता न मागे फिरून येणे निश्चय मनी हा एकच करा  ||४||

*एक* *अदभूत* *संवाद*

*एक* *अदभूत* *संवाद*  ( डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारा ) .  ही अलिकडचीच घटना आहे . मी बसने प्रवास करत असताना माझ्यासमोर झालेला हा संवाद आहे  बसमध्ये माझ्याशेजारी दोन जण बसले होते , त्यांच्या बोलण्यावरून ते खूपच जवळचे मित्र असावेत असे दिसले  , कारण मधेच खूप जोरजोरात बोलणे , हसणे व एकमेकाला टाळ्या देणे चालू होते. वेगवेगळ्या विषयांवर त्यांचे बोलणे चालू होते व काही जोक ही सांगत होते . दोघेही well educated वाटत होते  मराठी तसेच इंग्रजी त ही बोलत होते . बोलता बोलता  मधेच त्यांच्यात एका वेगळ्याच विषयावर बोलणे चालू झाले , जे मला एका वेगळ्याच जगात घेऊन गेले  जे मला वाटले , आपल्या समोर ठेवावे  . आता जास्त लेखकीय भाषा न वापरता त्यांच्यातला संवादच  इथे सांगतो . पहिला तरुण - म्हणजे जावेद तुला काय म्हणायचे आहे आमचा हिंदू समाज ढोंगी आहे ? काय बोलतोस तू ?  दुसरा तरुण - हो मंगेश , i am sure about my statement . आता आपण या संवादात या दोघांची नावे उल्लेख करूनच पुढे चालू ठेवू .  मंगेश - जावेद तू जे बोलतोस त्याला proof दे  जावेद -  हे बघ मंगेश ,...

*Happiness* *is* *in* *giving* !

*Happiness* *is* *in* *giving* ! Pls read this small story till end, this will amaze you indeed! This is based on the small experience through which I went recently . We all always look for happiness and do whatever for it . Some like reading , others to watch movies , travelling and so on . But still we everyone feel something is missing and this incompleteness keep us hungry to look again for something else more . My office is in koregaon park , pune . While going towards office there is a signal near Residency Club where I always used to see small child beggars who knock on car window and demands for money . Sometimes I have given them few bucks but I observed it may not be useful to them , so I started to purchase " *Wadapav* " before I reach signal and gave it to these kids . And they happily taken and ate it , so I felt happy with this change . But this is not  all about which I want to say , the main story is yet to tell . Whenever I pass from that signal i have seen o...

*आई* - *बाप* *हेच* *खरे* *देव* !

*आई* - *बाप* *हेच* *खरे* *देव* ! आयुष्यात पुढे जाताना काही गोष्टी चे महत्त्व नव्याने जाणवते . विशेषता ज्याचा अनुभव आपण स्वयं कधी घेतला नाही तो  जर आपल्यास आल्यास तरच ते पटते. सुख-दुःख यांच्या व्याख्या बदलत जातात , पन काही गोष्टी शाश्वत म्हणून आहेत आणि त्या आपल्या पुढे येतात .प्रत्येकाच्या श्रद्धा वेगळ्या असतात. आपन सगळे काहीतरी सतत शोधतच असतो , जे आपल्याला पूर्वी पेक्षा जास्त सुख देईल . देवाचे अस्तित्व खरे की खोटे , देव खरच आहे का हे कुणी छातीठोक पने सांगू शकते का?  मला स्वतःला असे वाटते की आपले आई-बाप हेच खरे देव आहेत . कारण त्यांनी आपल्याला जन्म दिला , मोठे केले , शिकविले या जगात राहन्याच्या योग्य बनविले . आयुष्यभर आपल्यासाठी खस्ता  खाल्ल्या ,  आपल्याला मोठे केले .हे सर्व आपल्यासमोर प्रत्यक्ष घडते ,याला अजुन वेगळा पुरावा कशाला हवाय? पन जो मंदिरात देव बसला आहे त्याने आपल्यासाठी प्रत्यक्ष काय असे केले आहे का ? ती एक पाषाण मूर्ति आहे ज्याची अपन पूजा करतो , पन आयुष्यात आई बापाच्या रूपाने प्रत्यक्ष देवच आहेत त्यांचा आपण प्रचंड आदर केला पाहिजे . त्यांच्या प्रत्येक इच्छा ...

# सावरकरांचे वैयक्तिक जीवन व स्वभावदर्शन

Image
 *वीर सावरकरांचे वैयक्तिक जीवन व स्वभावदर्शन !**  स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे अवघे  जीवन म्हणजे एक धगधगते अग्निकुंड  ! या माणसाने त्याचे सर्वस्व देशासाठी वाहून घेतले होते . ते नेहमी सांगत ,'देहाकडून देवाकडे जाताना मध्ये आपला देश लागतो व या देशाचे आपण काही  देणे लागतो'  अशावेळी त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल खूप कमी चर्चा झाली आहे वा माहीत झाले आहे .त्यामुळेच सावरकर समजून घेताना या लेखमालेत मी _तिसरा_ _भाग_  या विषयाला दिला आहे . भगूर हे गाव नाशिकपासून साधारणपणे दहा-पंधरा किलोमीटरवर आहे .या गावात २८ मे १८८३ ला विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म झाला .( आजही भगूर येथे सावरकरांचा वाडा आहे जो सरकारने *स्मारक* म्हणून जाहीर केला आहे ,हे अतिशय प्रेरणादायी ठिकाण असून प्रत्येकाने येथे भेट द्यावी अशी वाचकांना विनंती आहे  , खाली या वाड्याचा फोटो जोडला आहे ) त्यांचा मृत्यू २६ फेब्रुवारी १९६६ रोजी मुंबई येथे झाला . हा एकूण ८३ वर्षांचा प्रवास म्हणजे अतिशय अदभुत , रोमांचक , असंख्य संकटांनी भरलेला , उपेक्षा व अपमान , हेतुपूर्वक केलेले दुर्लक्ष यांनी भरलेला पण रोमह...